AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होणार तीन महिन्यांचा आमदार?

नागपूर : निवडणुकीसाठी अर्ज भरा, गावोगावी फिरुन प्रचार करा, या सर्व प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करा. एवढं सारं करुन तीन महिन्यांसाठी आमदार होण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नसतं. अगदी तिच परिस्थिती काटोल विधानसभेतील  पोटनिवडणुकीत आहे. 11 एप्रिलला काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी निकाल लागेल. आणि राज्यातालील विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता […]

कोण होणार तीन महिन्यांचा आमदार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

नागपूर : निवडणुकीसाठी अर्ज भरा, गावोगावी फिरुन प्रचार करा, या सर्व प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करा. एवढं सारं करुन तीन महिन्यांसाठी आमदार होण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नसतं. अगदी तिच परिस्थिती काटोल विधानसभेतील  पोटनिवडणुकीत आहे. 11 एप्रिलला काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी निकाल लागेल. आणि राज्यातालील विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे काटोलच्या नव्या आमदाराला फक्त तीन महिने कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते फारसे उत्सुक दिसत नाही.

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे काटोलमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली काटोलची जागा ही माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. तर युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. इथे राष्ट्रवादीचं पारडं जड असलं तरीही अनिल देशमुखही तीन महिन्यासाठी आमदारकी लढवण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे सर्व पक्षांनी मिळून यावर विचार करावा आणि पर्याय काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

काटोल विधानसभा

नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र1995 साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून आणि पुढे तेच अनिल देशमुख राष्ट्रवादीकडून जिंकत गेले. त्यामुळे पुढे काटोल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. मात्र 2014 साली डॉ. आशिष देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काटोल खेचून आणलं आणि जिंकले. मात्र, विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.

डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा

डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असलेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून विधानसभा लढवली आणि जिंकलेही. मात्र, विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

Follow Us
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांच्या अर्जावर... थेट कोर्टापर्यंत गेलं प्रकरण
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!