AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage).

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 27, 2020 | 9:07 AM
Share

पुणे : यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage). धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मागीलवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.

असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर दौंड इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशास्थितीत पाणी कमी असल्याने खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आलं नाही.

गेल्यावर्षी 4 धरणांमध्ये एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणी साठी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. मात्र, हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाच्या स्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. पुण्याचा मृत्यूदर घटला असून 25 जुलै रोजीच्या महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्याचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा कमी, तर भारतापेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.45 टक्के, मुंबई 5.59 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा 3. 65 टक्के आणि भारताचा 2.32 टक्के इतका मृत्यूदर आहे.

पुण्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 66 वर पोहचली आहे. यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 418 इतकी आहे. सध्या पुण्यात 18 हजार 494 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

Pune Water Shortage

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत