AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage).

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
| Updated on: Jul 27, 2020 | 9:07 AM
Share

पुणे : यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage). धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मागीलवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.

असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर दौंड इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशास्थितीत पाणी कमी असल्याने खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आलं नाही.

गेल्यावर्षी 4 धरणांमध्ये एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणी साठी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. मात्र, हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाच्या स्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. पुण्याचा मृत्यूदर घटला असून 25 जुलै रोजीच्या महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्याचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा कमी, तर भारतापेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.45 टक्के, मुंबई 5.59 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा 3. 65 टक्के आणि भारताचा 2.32 टक्के इतका मृत्यूदर आहे.

पुण्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 66 वर पोहचली आहे. यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 418 इतकी आहे. सध्या पुण्यात 18 हजार 494 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

Pune Water Shortage

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.