AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

येत्या 13 जूनला पालखी सोहळा सुरु होतो आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल, हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा या बैठकीत ठरवण्यात आलं.

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार
| Updated on: May 06, 2020 | 6:02 PM
Share

पुणे : लाखो वारकऱ्यांचे दैवत असलेले (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाबाबत आज निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आळंदी देवस्थानची सर्व विश्वस्त माऊली अश्वाचे मानकरी शितोळे सरकार चोपदार हैबतबाबाचे वंशज बाळासाहेब आरफळकर आणि इतर प्रमुख पंधरा सदस्यांचे एकमत (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) झाले आहे.

लाखो वारकऱ्यांचे दैवत असलेले आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान करायचे की नाही, याबाबत आज आळंदी देवस्थानची सर्व विश्वस्त माऊली अश्वाचे मानकरी शितोळे सरकार चोपदार हैबतबाबा चे वंशज बाळासाहेब आरफळकर हे आणि इतर प्रमुख असे पंधरा सदस्य यांच्यामध्ये आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झालं. मात्र, ही परंपरा अखंडित ठेवताना समाज आणि वारकऱ्यांचे आरोग्य आणि हित विचारात घेतलं जाईल, असाही निर्णय घेण्यात आला.

येत्या 13 जूनला पालखी सोहळा सुरु होतो आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल, हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा या बैठकीत ठरवण्यात आलं. याबाबत सरकारशी ही चर्चा केली जाईल. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) जे ठरलंय, त्यांचं वारकरी संप्रदायाने पालन करावं, असं आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केलं आहे. तसेच, इतर सात पालखी संस्थानांशी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे दोनवेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्यातील कोरोनाची राज्यातील स्थिती पाहून आळंदी पालखी सोहळ्यावर (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) निर्णय घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल

एका दिवसात तब्बल 38 पोलिसांना कोरोना, राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.