AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, धनलाभासह होणार सर्व मनोकामना पूर्ण

शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे उद्या लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. याचा तीन राशींना विशेष फायदा होणार आहे.

Astrology: 'या' राशींमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, धनलाभासह होणार सर्व मनोकामना पूर्ण
लक्ष्मी नारायण योग Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 04, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई, योग किंवा राज योगाचे विविध प्रकार ज्योतिषशास्त्रात (Astrology) स्पष्ट केले आहेत. यासोबतच कोणत्या ग्रहांच्या संयोगाने कोणते योग बनतात हे देखील सांगण्यात आले आहे. की ते. उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी शुक्र धनु राशीत जाणार आहे. याशिवाय  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 3 डिसेंबरला बुध ग्रहानेही याच राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) तयार होत आहे. या लक्ष्मी नारायण योगाचा 3 राशींना विशेष फायदा होणार आहे.  जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

सिंह

लक्ष्मी नारायण योग निर्माण होत असल्याने सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात त्यांना संतानसुख मिळेल आणि आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभेल. कुंडलीच्या पाचव्या घरात हा योग तयार झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यासोबतच प्रेम प्रकरणातही यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनाही धनु राशीतील लक्ष्मी नारायण योगाचा विशेष लाभ होईल. हे संक्रमण या राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच भौतिक सुख आणि मातेच्या स्थानात होत आहे. ज्यामुळे त्यांना या काळात भौतिक सुख मिळू शकते. तसेच, या काळात या राशीचे लोकं नवीन वाहन किंवा इतर चल-अचल मालमत्ता खरेदी करण्याची योजना करू शकतात. गुंतवणुकीसाठीही हा काळ उत्तम मानला जातो. तसेच, या काळात तुम्हाला आईच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

धनु

धनु राशीतील लक्ष्मी नारायण योगामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. हा योग तयार झाल्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धनु राशीच्या चढत्या घरामध्ये हा योग तयार झाल्यामुळे या काळात राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.