AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : या सवयींमुळे नाराज होते माता लक्ष्मी, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना

शास्त्रानुसार माता लक्ष्मीला (Mata Lakshmi Puja) धन लक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. काही चुका केल्याने लक्ष्मी नाराजही होते.

Astrology : या सवयींमुळे नाराज होते माता लक्ष्मी, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना
लक्ष्मी उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 27, 2023 | 6:44 PM
Share

मुंबई : माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. असे म्हणतात की ज्या घरात लक्ष्मी वास करते त्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता नसते. माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. यामुळेच जीवनातील प्रत्येक व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून श्रीमंत व्हायचे असते. जरी असे बरेच लोकं आहेत जे कठोर परिश्रमासह पुष्कळ पूजा-अर्चा करतात, परंतु ते नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे व्यथित आणि अडचणीत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), एखाद्या व्यक्तीच्या समस्यांचे कारण त्याच्या काही सवयी देखील असू शकतात. माणसाच्या काही सवयी असतात ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून निघून जाते. त्या व्यक्तीच्या त्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

या कारणांमुळे माता लक्ष्मी होते नाराज

  • आळशी लोकांवर माता लक्ष्मी नेहमी रागावते. असे लोक कधीही यश मिळवत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात. आळसापासून दूर राहिल्यासच देवी लक्ष्मीची प्राप्ती होते.
  • घर अव्यवस्थित ठेवल्याने नशिबाला आमंत्रण मिळते आणि देवी लक्ष्मी रागावते. तसेच पलंगावर पडलेल्या घाणेरड्या व अस्वच्छ चादरी आणि खोलीत पसरलेला कचरा यामुळे दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या आणि खोलीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
  • जर तुम्ही देखील सूर्यास्तानंतर घर झाडत असाल आणि पुसत असाल तर ही सवय लगेच सोडा. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने ही अतिशय चुकीची सवय आहे. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात कलह सुरू होतो, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीही घर झाडू नका.
  • ताटात उष्टे अन्न कधीही ठेवू नये. याशिवाय कधीही न वापरलेली भांडी जास्त काळ ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी धुवावीत किंवा घराबाहेर ठेवावी.
  • जे लोक यश मिळाल्यावर बढाई मारायला लागतात किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावतात, अशा व्यक्तीची साथ देवी लक्ष्मी लवकर सोडते. त्यामुळे अहंकार टाळा. तसेच, इतरांचा आदर करण्यास विसरू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.