AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 21, 2022 | 9:01 AM
Share

Astrology: जास्त रागावणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार (Jotishshastra) प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो. त्या स्वामी ग्रहाचा प्रभाव जातकांच्या स्वभावावर पडतो. अशा राशींवर अशुभ ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्तीचा स्वभाव नकारात्मक होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो. याशिवाय अनेक संमस्यांना त्यांना समोर जावे लागते.

  1.  वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एवढेच नाही तर त्यांना शांत करणे कठीण असते. कधीकधी ते असे निर्णय घेतात की त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. या राशीच्या स्त्रिया कधीच आपली चूक मान्य करत नाहीत.
  2. वृश्चिक- या राशीच्या महिलांनाही रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यांना राग आल्यानंतर त्या कधीच परिणामाची चिंता करीत नाही. या राशीच्या श्रीयांचा सहसा त्यांच्या जोडीदारावर जास्तच राग निघतो. रंगामुळे त्या आयुष्यात बरेच नुकसान करून घेतात. वृश्चिक राशीच्या स्त्रियांना राग आल्यावर त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य.
  3.  सिंह- या राशीच्या मुली लवकर हायपर होतात. राग आल्यावर त्या सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक कधीही मान्य करत नाहीत.
  4. कन्या- या राशीच्या मुलींना लवकर राग येतो. त्यांना राग आला की त्या कशाचीच पर्वा करत नाही. त्यांच्या रागीट  स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करतात. कन्या राशीच्या स्त्रियांना राग गेल्यावर पश्चातापाशिवाय पर्याय नसतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...