AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशिबवान लोकांच्या गालावर पडते खळी, असे असते त्यांचे भाग्य

समुद्रशास्त्रानुसार, डिंपल असलेले लोक त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. असे लोक आपल्या जोडीदारांना आदर आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोक आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.

नशिबवान लोकांच्या गालावर पडते खळी, असे असते त्यांचे भाग्य
समुद्रशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 17, 2024 | 4:03 PM
Share

मुंबई : समुद्रशास्त्रानुसार (Samudrashastra), चेहऱ्यावर अनेक खुणा असतात ज्यांचा माणसाच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते, पण  समुद्रशास्त्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या गालावर खळी पडत असेल तर असे लोकं खुप भाग्यवान मानले जातात. वास्तविक, समुद्रशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्यांच्या गालावर खळी असते ते कोणालाही आपल्याकडे आकर्षित करण्यात अव्वल असतात. असे लोकं अत्यंत आकर्षक असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खळी असेल तर त्याचा कसा फायदा होतो हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

खळी असलेले लोक जोडीदारासाठी भाग्यवान असतात

समुद्रशास्त्रानुसार, खळी असलेले लोकं त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. असे लोकं आपल्या जोडीदारांना आदर आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोकं आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.

त्यांच्या जीवनात शुक्राचा प्रभाव आहे

गालावर खळी असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचा प्रभाव असतो. वास्तविक त्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत राहते. त्यांच्या जीवनात शुक्राच्या प्रभावामुळे लोकांमध्ये आदर वाढतो आणि गर्दीत त्यांची ओळख वेगळी बनते.

पैशाच्या बाबतीत भाग्यवान आहात

अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते आणि ते इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. इतकंच नाही तर खळी असलेल्या मुलींचं कुठेतरी लग्न झालं तर त्यांना आर्थिक फायदाही होतो.

खळी असलेली मुले आणि मुली भाग्यवान असतात

वैवाहिक जीवनात एखादा मुलगा खळी असलेली मुलगी भेटला तर ती तिच्या पतीला खूप प्रिय असते. नवरा तिचं म्हणणं सगळं मान्य करायला तयार असतो. खळी असलेल्या मुलींच्या खेळकर स्वभावाने पती नेहमीच आनंदी असतात. तर खळी असलेले पुरुष आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण