AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palmistry : भाग्यशाली लोकांच्या हातावर असते असे चिन्ह, अचानक होतो धनलाभ

हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जात असली तरी हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते.

Palmistry : भाग्यशाली लोकांच्या हातावर असते असे चिन्ह, अचानक होतो धनलाभ
हस्तरेषाशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 09, 2023 | 4:31 PM
Share

मुंबई : आपले भविष्य आपल्या हातात आहे, असे बरेचवेळा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. मात्र, हे खरं आहे. हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जात असली तरी हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते. म्हणूनच हस्तरेषाशास्त्रात हस्तरेखाच्या या 4 रेषा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या रेषा व्यक्तीचे वय, भाग्य, संपत्ती, पात्रता इत्यादीबद्दल सांगतात. हस्तरेषा शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेषा आणि खुणा यांचा अभ्यास केल्यास त्याचे भविष्यही कळू शकते. या ओळी आणि चिन्हांद्वारे, नशीब तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी साथ देईल की नाही हे जाणून घेऊ शकता.

त्रिकोण

हस्तरेषा शास्त्रानुसार त्रिकोण अतिशय शुभ मानली जाते. तळहातातील भाग्यरेषा, आरोग्य रेषा आणि मस्तकी रेषा याने तयार होणाऱ्या त्रिकोणाला धन कोठडी म्हणतात. हा त्रिकोण कोठूनही उघडता कामा नये. सर्व बाजूंनी त्याचे बंद असणे शुभ मानले जाते.

ज्या व्यक्तीच्या तळहातावर अशा प्रकारचे त्रिकोण असते ते लोकं बक्कळ पैसा कमावतात. दुसरीकडे, त्रिकोणाच्या आत क्रॉस चिन्ह असल्यास अशा व्यक्तीच्या संपत्तीचा नाश होतो.

अशा लोकांवर असतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच तळहातावरील या चिन्हाला विष्णु योग म्हणतात. अशा व्यक्तीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा असते. कमळाचे चिन्ह असल्यामुळे व्यक्ती नेतृत्व आणि वक्तृत्वात पारंगत होते. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

अशा व्यक्तीला मिळतो अचानक पैसा

एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या वरच्या भागात मणिबंधाजवळ जीवनरेषेला माशाचे चिन्ह जोडलेले असेल तर ते खूप शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला अचानक पैसा मिळतो. या लोकांना परदेशातूनही चांगला लाभ मिळतो. आजूबाजूचे लोकं त्याचा खूप आदर करतात. यासोबतच त्यांना भरपूर वडिलोपार्जित संपत्तीही मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.