Zodiac | ‘अँग्री बर्ड’ असतात या 5 राशीचे लोक, इतरांसोबत स्वतःचेही नुकसान करतात
ज्योतिषशास्त्रातील या 5 ( 5zodiac) राशी अतिशय रागीट मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
मुंबई : प्रत्येक माणूस वेगळा असतो. माणसाच्या राशीचा (Zodiac) त्याच्या आयुष्यावर परिणाम होत असतो.जसे कोणत्या राशीच्या व्यक्तीला जास्त राग येतो किंवा कोणाला आरामात बोलायला आवडते. अशा प्रकारे राशीच्या आधारे त्यांचा स्वभाव, वागणूक, आवडी-निवडी कळते. ज्योतिषशास्त्रातील या 5 ( 5zodiac) राशी अतिशय रागीट मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
मेष मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो व्यक्तीमध्ये आक्रमकता वाढवतो. यामुळे या राशीचे लोक खूप रागावतात आणि त्यांना लवकर राग येतो. लहानसहान गोष्टींना वाईट समजून ते कोणावरही रागावतात. या राशींच्या लोकांना शांत करणे देखील खूप कठीण आहे.
वृषभ वृषभ राशीच्या नावावरून हे स्पष्ट होते की ते बैलासारखे कष्टाळू असतात पण ते राग काढतात. या राशींचे लोक शांत होई पर्यंत बरेच नुकसान झालेले असते. या राशीच्या लोकांसमोर चुकीचे बोलणे त्रासदायक ठरते.
मिथुन मिथुन राशीच्या लोकांना राग लवकर येत नसला तरी तो ज्वालामुखीसारखा असतो. एकदा का हे लोक भडकले की त्यांना शांत करणे फार कठीण असते. कृती झाल्यावर त्यांना त्यांच्या वागण्याचा खूप त्रास होतो.
सिंह सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. हे लोक खूप उत्साही असतात पण त्यांना पटकन राग येतो. रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात आणि इतरांचे मोठे नुकसान करतात.
वृश्चिक वृश्चिक राशीचे लोक सुद्धा खूप चिडलेले असतात. त्यांच्या इज्जतीचा विषय निघाला तर ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि रागावतात.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधित बातम्या :
Rashifal : पैशांचे व्यवहार करताना ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज!
Shani Pradosh Vrat Katha : प्रदोष काळात पूजेच्या वेळी ही व्रत कथा वाचा, जाणून घ्या याबद्दल!