AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyoga: आर्थिक तंगीतून मुक्त होणार या चार राशी, 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार राजयोग

हा शुभ योग चार राशीच्या लोकांसाठी सुख, समृद्धी आणि नशीब घेऊन येणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी गुरू-शुक्र यांच्या संयोगाने बनलेला भाग्य बदलणारा राजयोग नशीब पालटणारा ठरेल.

Rajyoga: आर्थिक तंगीतून मुक्त होणार या चार राशी, 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार राजयोग
राजयोगImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 02, 2023 | 8:34 AM
Share

मुंबई, 15 फेब्रुवारीला सुखाचा दाता शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बृहस्पति आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे नशिबाचा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ राजयोग (Rajyoga) निर्माण होणार आहे. ज्योतिष तज्ञांच्या मते  हा शुभ योग चार राशीच्या लोकांसाठी सुख, समृद्धी आणि नशीब घेऊन येणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी गुरू-शुक्र यांच्या संयोगाने बनलेला भाग्य बदलणारा राजयोग नशीब पालटणारा ठरेल.

या चार राशींचे भाग्य उजळणार

मिथुन-

भाग्य बदलणारा राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरेल. शुक्र आणि गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. नोकरदारांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना फायदा होईल.

कर्क-

राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी जीवनाच्या विविध क्षेत्रात अनेक नवीन सुवर्ण संधी घेऊन येईल. शुक्र वरात आहे, तर बृहस्पति महाराज स्वतःच्या राशीत बसले आहेत. परिणामी, नवीन वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीची शक्यता दिसत आहे. वडिलांच्या प्रकृतीतही सुधारणा होईल. कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारख्या व्यवसायाशी संबंधित लोकांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या-

कन्या राशीच्या लोकांसाठी नशीब बदलण्यासाठी राजयोग अत्यंत शुभ राहील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि पैशाचा प्रवाहही सुरळीत राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

वृश्चिक-

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कुंडलीच्या पाचव्या घरात राजयोग तयार होईल. कुंडलीचे पाचवे घर संतती, प्रगती, प्रेमविवाह आणि अचानक धनलाभ इत्यादी दर्शवते. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांना लग्न करायचे आहे ते 15 फेब्रुवारीनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...