AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंडलीत शनीचा प्रकोप आहे? मग ‘हे’ उपाय नक्की करा

ज्योतिषशास्त्रात (Astrology) शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेव (Shanidev) लोकांना केलेल्या कर्माचे फळ देतात. चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केल्याने वाईट फळ मिळते. असे मानले जाते की, गरीब आणि असहायांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. जी व्यक्ती नेहमी गरिबांची मदत करते, त्यांच्यावर शनिदेव नेहमी आपला आशीर्वाद ठेवतात. दुसरीकडे गरीब आणि असहाय्य लोकांना त्रास […]

कुंडलीत शनीचा प्रकोप आहे? मग 'हे' उपाय नक्की करा
शनी अमावस्या
| Updated on: Jun 21, 2022 | 7:27 PM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेव (Shanidev) लोकांना केलेल्या कर्माचे फळ देतात. चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केल्याने वाईट फळ मिळते. असे मानले जाते की, गरीब आणि असहायांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. जी व्यक्ती नेहमी गरिबांची मदत करते, त्यांच्यावर शनिदेव नेहमी आपला आशीर्वाद ठेवतात. दुसरीकडे गरीब आणि असहाय्य लोकांना त्रास देणाऱ्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. जेव्हा शनिदेव अशुभ असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात साडेसाती (sadesati), ढय्या आणि शनि दोष असतो. शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कुंडलीत शनीला बलवान करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

कुंडलीत शनीचा लाभ

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत शनी उसाचं स्थानी असते त्यांना शनिदेव नेहमी शुभ आणि सकारात्मक परिणाम देतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव तूळ राशीमध्ये उच्चस्थानी असतात म्हणजेच जेव्हा शनि तूळ राशीमध्ये उच्च असतो तेव्हा व्यक्तीला चांगले आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. जेव्हा शनि शुभ असतो तेव्हा व्यक्ती सक्रिय आणि न्यायी बनते. शुभ शनीच्या प्रभावामुळे व्यक्तीचे भाग्य बलवान बनते. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. कुंडलीत शनि शुभ असतो तेव्हा व्यक्तीचे मन नेहमी सकारात्मक राहते आणि निरोगी आयुष्य जगतो.

कुंडलीत शनी अशुभ घरात असल्यास

ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव अशुभ घर किंवा शत्रूसोबत राहतात, त्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात. कुंडलीत शनि कमजोर असताना व्यक्ती गंभीर आजारांनी त्रस्त होतो.कायद्याच्या कचाट्यात अडकतो. नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसायात तोटा होतो आणि योजना योग्य प्रकारे साकार होत नाहीत. अशा व्यक्तीला सगळीकडून निराशाच मिळते.

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय

  1. शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास दिवस मानला जातो. शनिवारी शनीचे दर्शन घ्या आणि शनिदेवाच्या मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मोहरीचे तेल अर्पण करा.
  2. शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनि चालिसाचे पठण करावे.
  3. शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे हा देखील शनिदोषापासून मुक्ती मिळवण्याचा सोपा उपाय आहे.
  4. शनिवारी हनुमान मंदिरात नारळ फोडा आणि शेंदूर अर्पण करा.
  5. शनिवारी ‘ओम प्रं प्रेमं प्रण सह शनिश्चराय नमः’ आणि ओम शनिश्चराय नमः’ या मंत्रांचा जप करावा.
  6. कुंडलीतून शनि दोष दूर करण्यासाठी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे या काळ्या वस्तूंचे दान करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.