AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Dev : या पाच राशींवर असते शनिदेवांची कृपा, साडेसाती आणि अडीचकीतही देतात कमी त्रास

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शनिदेवांना पापग्रह असं संबोधलं असलं तरी ते न्यायदेवतेची भूमिका बजावतात. म्हणजेच जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात.

Shani Dev : या पाच राशींवर असते शनिदेवांची कृपा, साडेसाती आणि अडीचकीतही देतात कमी त्रास
शनिदेवांचा आशीर्वाद असल्याने पाच राशीचे लोकं असतात नशिबान, वाचा तुमची रास आहे का?
| Updated on: Apr 05, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई – शनिदेव म्हंटलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिच्या दरबारात कोणी छोटा अगर मोठा नाही. ते त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. त्यामुळे एकदा शनिदेव राशीला आले की पळता भूई थोडी होते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थानाकडे बारीक लक्ष ठेवलं जातं. कारण शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एका राशीत फिरुन परत येण्यासाठी 30 वर्षांचा अवधी लागतो. त्यामुळे शनिदेव राशीला आले की आले मोठी उलथापालथ व्हायला सुरुवात होते.

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. पण असं असलं तरी त्यांना न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. ते जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात. जातकांना आयुष्यात एकदा तरी शनिदेवांच्या प्रकोपाला सामोरं जावं लागतं. साडेसाती, अडीचकी किंवा महादशेत शनिदेव चांगलाच दणका देतात. आर्थिक, आरोग्य आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. असं असलं तरी 12 राशींपैकी पाच राशींवर शनिदेवांची कृपा कायम असते.

या राशींवर शनिदेव असतात प्रसन्न

वृषभ – या राशीचा स्वामी शुक्र आहे. तसेच चंद्राची उच्च रास आहे. शनि आणि शुक्रामध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शनिदेवांची ही आवडची रास आहे. शनिदेव भाग्य स्थान आणि कर्मस्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे शनिदेव कायम या राशीवर प्रसन्न असतात. साडेसाती, अडीचकी आणि महादशेतही शनिदेव चांगली फळं देतात.

कर्क – या राशीचा स्वामी चंद्र असून जलतत्व असलेली रास आहे. त्यामुळे या राशीवर शनिदेव दुष्प्रभाव टाकत नाहीत. कुंडलीत शनि साडेसाती किंवा महादशा सुरु असेल तर मात्र थोडा त्रास होऊ शकतो.

तूळ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ही शनिदेवांची उच्च स्थान असलेली रास आहे. यामुळे शनि साडेसातीत तसा प्रभाव दिसून येत नाही. पण असं असलं तरी शनिदेव न्यायदेवता आहेत हे विसरू नका.

कन्या – या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीचे तीन घरांचे स्वामी बुध, शनि आणि शुक्र आहे. त्यामुळे शनि किंवा चंद्र त्रिकोण भावात येतात. त्यामुळे शनिचा नकारात्मक प्रभाव तसा पडत नाही. पण जातकांनी आपली कर्म चांगली ठेवणं महत्त्वाचं आहे.

मीन – या राशीचा स्वामी गुरु बृहस्पती असून जलतत्व असलेली रास आहे. शनि आणि गुरु युती चांगलं फळ देणारी युती आहे. त्यामुळे साडेसातीतही शनिदेव कृपा ठेवतात. म्हणजेच नाहक त्रास देण्याऐवजी कर्मानुसार फळं देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.