AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: घरात ही एक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी राहते कायम प्रसन्न, कुटूंबातील सदस्यांना मिळते दिर्घायूष्य

घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते. कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्याशी संबंधित समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Vastu Tips: घरात ही एक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी राहते कायम प्रसन्न, कुटूंबातील सदस्यांना मिळते दिर्घायूष्य
कासव Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2023 | 8:24 AM
Share

मुंबई, हिंदू धर्मात कासवाला (tortoise vastu Tips) अतिशय पवित्र मानले जाते. कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. घरामध्ये कासव ठेवल्याने लक्ष्मीच्या आशीर्वादासह सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर समुद्रमंथनाच्या वेळी कासवाची उत्पत्ती झाल्याचेही सांगितले जाते. वास्तू आणि फेंगशुईमध्येही धातूचे कासव खूप शुभ मानले जाते. घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. असे मानले जाते की, भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी देखील घरात निवास करते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह निर्माण करते. घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते. कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्याशी संबंधित समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया त्यासंबंधीचे नियम आणि फायदे.

क्रिस्टल कासवाचे फायदे

वास्तू तज्ज्ञ सांगतात की, जर एखाद्याला पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्याने घरात क्रिस्टल कासव ठेवावे. असे म्हटले जाते की घरात क्रिस्टल कासव ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य मिळते. यासोबतच सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.

दुसरीकडे, सफ्टिकाचे कासव घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्याने घरात क्रिस्टल कासव ठेवावे. यामुळे व्यक्तीला नोकरीत यश मिळेल आणि नोकरीत चांगली कामगिरी करता येईल. सौभाग्य आणण्यासाठी ते ऑफिस किंवा बेडरूममध्ये देखील ठेवता येते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे.

क्रिस्टल कासवासंबंधी नियम

वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल कासव पाळणे तेव्हाच शुभ फळ देते जेव्हा ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवले जाते. कासव हा अतिशय शांत प्राणी असून त्याला घरात ठेवल्याने शांततेचे वातावरण निर्माण होते. या नियमांचे योग्य पालन केल्यास कासव तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. हे एक प्रभावी यंत्र आहे, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.

इतर फायदेही जाणून घ्या

कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं. याने घरात सुख-शांती नांदते.

नवीन व्यापार सुरु करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह होता आणि स्थिरता राहते.

फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजे बैकयार्डमध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्य रित्या पार पडतात.

करिअरमध्ये उन्न्तीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेत ठेवावा. ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते.

घराच्या मुख्य दारात पश्चित दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते.

कासव गुड लकसाठी ठेवण्यात येतं म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या मादा कासव ठेवल्याने दंपत्तीला संतान सुख मिळतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.