AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दंगलीत खटला दाखल झाल्यानंतर काय होतं ? दंगलींचे खटले अनेक वर्ष का चालतात ?

दंगल होऊन जाते, ताकदीने तरूणाई आक्रोशही सुध्दा दर्शवते. पुढे आयुष्यभर दंगलीत सहभागी झाल्याचा पश्चाताप करत बसते. कारण दंगलीत फेकलेला एक दगड आयुष्यात किती अडचणीचा ठरतो, हे वेळ निघून गेल्यावर कळतं.

दंगलीत खटला दाखल झाल्यानंतर काय होतं ? दंगलींचे खटले अनेक वर्ष का चालतात ?
maharashtra policeImage Credit source: tv9 marathi
Aarti Auti
Aarti Auti | Edited By: महेश घोलप | Updated on: Jun 13, 2023 | 4:36 PM
Share

आरती औटी, मुंबई : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी दोन गटात गोंधळ सुरु असल्याचे पाहायला मिळतं आहे. काही तरुणींनी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कोल्हापूरात (latest kolhapur news) मागच्या आठवड्यात याचं कारणामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूरच्या पोलिसांनी तिथं इंटरनेट बंद ठेवलं. परिस्थिती मावळल्यानंतर पुन्हा सुरु केलं. कोल्हापूर सिटीमध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला असून संशयित तरुणांना ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ज्या तरुणांनी सोशल मीडियावर वाद होईल अशा पोस्ट ठेवल्या आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जे तरुण उसळलेल्या दंगलीत सामील झाले होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या पोलिस करीत आहेत. त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेऊ नका, तसेच शांतता राखा असं आवाहन महाराष्ट्रातील (maharashtra police) पोलिसांनी केलं आहे.

दंगल होऊन जाते, ताकदीने तरूणाई आक्रोशही सुध्दा दर्शवते. पुढे आयुष्यभर दंगलीत सहभागी झाल्याचा पश्चाताप करत बसते. कारण दंगलीत फेकलेला एक दगड आयुष्यात किती अडचणीचा ठरतो, हे वेळ निघून गेल्यावर कळतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दंगलीत काही वेळासाठी सहभागी झालेल्या तरूणाईचं आयुष्यभराचं काय नुकसान होतं. हे सहभागी झालेल्या व्यक्तीला माहित असतं. कारण दंगलीवेळी कायदा हाती घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला थांबवण्यासाठी होणाऱ्या परिणामांची जाणीव असेलली बरी…

सहभागी झाल्यानंतर कोणते गुन्हे, कलम लावली जातात

कलम 353 सरकारी कामात अडथळा कलम 427 तोडफोड करणे कलम 188 सरकारी आदेशाचं उल्लंघन कलम 109 गुन्ह्यास उत्तेजन देणं कलम 143 नुकसान घडवून आणणं

समजा, दंगलीत तुम्ही सहभागी नसला, पण जमावबंदीचं उल्लंघन करुन तुम्ही फक्त गर्दीत जरी शिरलात, तरी तुमच्यावर जमावबंदीचं कलम १४४ लागू होतं. त्याचबरोबर सोशल मीडियावर तु्म्ही आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्यास कलम 153 लागू होतं

तरुणांचं नुकसान काय होतं

खासगी नोकरी लागल्यानंतर संबंधित कंपनीनं एनओसी मागितली, तर पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. जर कंपनीचं तसं धोरण असल्यास तुम्हाला नोकरीवरती पाणी सोडावं लागतं. शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाताना व्हिसा किंवा पासपोर्टवेळी असंख्य अडचणी येतात. त्याचबरोबर पोलीस भरती, सैन्य भरती किंवा इतर सरकारी नोकरीच्यावेळी तुम्हाला पोलिसांकडून एनओसी मिळत नाही.

दंगलींचे खटले किती वर्षे चालतात ?

आतापर्यंतचा दंगलींचा इतिहास तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, आजवर एकाही नेत्यावर अथवा, नेत्यांच्या मुलांवर दंगलीबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 2009 ला मिरजेत जी दंगल झाली होती, ते खटले 2019 पर्यंत चालले. 2004 ला भांडारकर मंडळाच्या तोडफोडीचे खटले 2017 पर्यंत म्हणजे 13 वर्ष चालले. म्हणजे पंचविशीतल्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते वयाची 35 शी ओलांडल्यानंतर खटल्यांमधून मुक्त होतील.

तरूणाईचं सळसळतं रक्त समाजाच्या भल्यासाठी खर्ची झालं पाहिजे. परंतु सध्या तरुणाईचा दुरूपयोग होताना दिसतं आहे. हे थांबायला हवं. एक दंगल तुम्हाला तुमच्याच नजरेत आयुष्यभरासाठी आरोपी बनवते. तुमच्या परिवाराचं, तुमच्या चांगल्या आयुष्यतील करिअरची स्वप्न भंग करते. दंगलीत सहभागी होणारे गुन्हे, कलमं, यांचे वाईट परिणाम आम्ही तुमच्यासमोर मांडले आहेत. आता विचार तुम्ही करा ?

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.