AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातलं एक असं गाव जेथे घरांना दरवाजेचं नाही, चोरी झाल्यास चोराचे काय होते?

भारतातील हे अनोखे गाव महाराष्ट्रात आहे. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्या गावाचे नाव शनी शिंगणापूरबद्दल. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनि महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येथे येतात. येथे शनिदेवाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. शिंगणापूर गावाचे रक्षण फक्त शनिदेव करतात असे म्हणतात.

महाराष्ट्रातलं एक असं गाव जेथे घरांना दरवाजेचं नाही, चोरी झाल्यास चोराचे काय होते?
शनि शिंगणापूरImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई : टिव्हीवर किंवा वृत्तपत्रात आपण चोरी आणि दरोड्याच्या घटना नेहमीच पाहत असतो किंवा वाचत असतो. मात्र भारतात एक अशी जागा आहे जिथे कोणाच्याच घरातून एक सुई देखील गायब होत नाही. कदाचित हे जगातील पहिले गाव असेल जिथे घरांना दरवाजे नसतील. एवढेच नाही तर येथे असलेल्या बँका आणि मोठ्या दुकानांनाही टाळे लागलेले नाहीत. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, या कलीयुगातही दरवाजे आणि कुलूप नसलेल्या घरांमध्ये कधीही चोरी होत नाही. पैसे विसरा, इथे चोर छोट्या गोष्टीलासुद्धा हात लावायला घाबरतो. तर आज आपण भारतातील या अनोख्या गावाविषयी (City without Door in India) सविस्तर जाणून घेऊया.

कोणत्याही घराला किंवा दुकानाला कुलूप नसलेलं हे गाव कुठे आहे?

भारतातील हे अनोखे गाव महाराष्ट्रात आहे. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्या गावाचे नाव शनी शिंगणापूरबद्दल. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनि महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येथे येतात. येथे शनिदेवाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. शिंगणापूर गावाचे रक्षण फक्त शनिदेव करतात असे म्हणतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. शनिदेव माणसाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृत्याची नोंद ठेवतात. शनिदेव वाईट कर्म करणार्‍यांना शिक्षा देतात आणि पुण्य करणार्‍यांना आशीर्वाद देतात. या कारणास्तव असे म्हटले जाते की शनिदेवाची इच्छा असेल तर तो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतात.

शनि शिंगणापूर गावातील लोकांची अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे की शनिदेव आपले आणि आपल्या घराचे रक्षण करतात. आजही या गावातील लोक या समजुतींना मानत आहेत आणि त्यांच्या घराला किंवा दुकानाला दरवाजा लावत नाहीत. या गावातील सर्व घरे तुम्हाला दार नसलेली आढळतील. मिळालेल्या माहितीनुसार, युको बँकेने आपली पहिली लॉकलेस शाखा शनि शिंगणापूर येथे सुरू केली आहे. ग्रामस्थांचा विश्वास लक्षात घेऊन बँकेच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आलेले नाही. येथे फक्त काचेचे प्रवेशद्वार करण्यात आले आहे.

शनि शिंगणापुरात चोरी न होण्याचे कारण काय?

प्रचलित पौराणिक मान्यतेनुसार, गावात एकदा मुसळधार पाऊस पडला, त्या दरम्यान गावकऱ्यांना काळ्या खडकाचा एक मोठा दगड सापडला आणि लोकांनी तो दाबला तेव्हा त्यातून रक्त वाहत होते. नंतर त्या रात्री गावाच्या प्रमुखाने एक स्वप्न पाहिले जेथे शनिदेवाने त्याला गावात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की कोणीही मंदिरात राहू नये. या गावाचे रक्षण मी सदैव करीन असे शनिदेवाने प्रमुखाला सांगितले. अशा प्रकारे येथे शनिदेवाचे मंदिर बांधले गेले. मान्यतेनुसार, शनिदेव या गावात भौतिकरित्या उपस्थित असून ग्रामस्थांचे रक्षण करतात. तसेच जो येथे चोरी करतो त्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो असे लोकं सांगतात. अनेकांना याचा अनुभव आला असल्याचेही ग्रामस्थ सांगतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.