AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातलं एक असं गाव जेथे घरांना दरवाजेचं नाही, चोरी झाल्यास चोराचे काय होते?

भारतातील हे अनोखे गाव महाराष्ट्रात आहे. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्या गावाचे नाव शनी शिंगणापूरबद्दल. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनि महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येथे येतात. येथे शनिदेवाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. शिंगणापूर गावाचे रक्षण फक्त शनिदेव करतात असे म्हणतात.

महाराष्ट्रातलं एक असं गाव जेथे घरांना दरवाजेचं नाही, चोरी झाल्यास चोराचे काय होते?
शनि शिंगणापूरImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई : टिव्हीवर किंवा वृत्तपत्रात आपण चोरी आणि दरोड्याच्या घटना नेहमीच पाहत असतो किंवा वाचत असतो. मात्र भारतात एक अशी जागा आहे जिथे कोणाच्याच घरातून एक सुई देखील गायब होत नाही. कदाचित हे जगातील पहिले गाव असेल जिथे घरांना दरवाजे नसतील. एवढेच नाही तर येथे असलेल्या बँका आणि मोठ्या दुकानांनाही टाळे लागलेले नाहीत. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, या कलीयुगातही दरवाजे आणि कुलूप नसलेल्या घरांमध्ये कधीही चोरी होत नाही. पैसे विसरा, इथे चोर छोट्या गोष्टीलासुद्धा हात लावायला घाबरतो. तर आज आपण भारतातील या अनोख्या गावाविषयी (City without Door in India) सविस्तर जाणून घेऊया.

कोणत्याही घराला किंवा दुकानाला कुलूप नसलेलं हे गाव कुठे आहे?

भारतातील हे अनोखे गाव महाराष्ट्रात आहे. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्या गावाचे नाव शनी शिंगणापूरबद्दल. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनि महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येथे येतात. येथे शनिदेवाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. शिंगणापूर गावाचे रक्षण फक्त शनिदेव करतात असे म्हणतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. शनिदेव माणसाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृत्याची नोंद ठेवतात. शनिदेव वाईट कर्म करणार्‍यांना शिक्षा देतात आणि पुण्य करणार्‍यांना आशीर्वाद देतात. या कारणास्तव असे म्हटले जाते की शनिदेवाची इच्छा असेल तर तो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतात.

शनि शिंगणापूर गावातील लोकांची अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे की शनिदेव आपले आणि आपल्या घराचे रक्षण करतात. आजही या गावातील लोक या समजुतींना मानत आहेत आणि त्यांच्या घराला किंवा दुकानाला दरवाजा लावत नाहीत. या गावातील सर्व घरे तुम्हाला दार नसलेली आढळतील. मिळालेल्या माहितीनुसार, युको बँकेने आपली पहिली लॉकलेस शाखा शनि शिंगणापूर येथे सुरू केली आहे. ग्रामस्थांचा विश्वास लक्षात घेऊन बँकेच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आलेले नाही. येथे फक्त काचेचे प्रवेशद्वार करण्यात आले आहे.

शनि शिंगणापुरात चोरी न होण्याचे कारण काय?

प्रचलित पौराणिक मान्यतेनुसार, गावात एकदा मुसळधार पाऊस पडला, त्या दरम्यान गावकऱ्यांना काळ्या खडकाचा एक मोठा दगड सापडला आणि लोकांनी तो दाबला तेव्हा त्यातून रक्त वाहत होते. नंतर त्या रात्री गावाच्या प्रमुखाने एक स्वप्न पाहिले जेथे शनिदेवाने त्याला गावात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की कोणीही मंदिरात राहू नये. या गावाचे रक्षण मी सदैव करीन असे शनिदेवाने प्रमुखाला सांगितले. अशा प्रकारे येथे शनिदेवाचे मंदिर बांधले गेले. मान्यतेनुसार, शनिदेव या गावात भौतिकरित्या उपस्थित असून ग्रामस्थांचे रक्षण करतात. तसेच जो येथे चोरी करतो त्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो असे लोकं सांगतात. अनेकांना याचा अनुभव आला असल्याचेही ग्रामस्थ सांगतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.