AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वास्तुनुसार घरात या ठिकाणी मीठ चुकूनही ठेवू नये; अन्यथा नकारात्मकता झपाट्याने आकर्षित होते

मीठ हे केवळ चव आणणारे घटक नाही तर त्यामुळे घरातील वातावरण ते नकारात्मक ऊर्जा यासर्वांवरच रामबाण उपाय आहे. पण दर योग्य पद्धतीने मीठ साठवले नाही, योग्य दिशेला ठेवले नाही तर मीठ नकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे मीठ योग्य प्रकारे साठवणे फार महत्त्वाचे मानले जाते.

वास्तुनुसार घरात या ठिकाणी मीठ चुकूनही ठेवू नये; अन्यथा नकारात्मकता झपाट्याने आकर्षित होते
According to Vastu, salt should not be kept in this place in the house by mistake; otherwise, negativity is attracted.Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 7:38 PM
Share

हिंदू संस्कृतीत, प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व दिले जाते, विशेषतः जेव्हा ती अन्नाशी संबंधित असते. अशीच एक गोष्ट म्हणजे मीठ. मीठ जे केवळ चवीसाठीच वापरलं जातं असं नाही तर वास्तूशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे

जीवनात संतुलन राखण्याचे घटक देखील मानले जाते. अन्नाला चवदार बनवण्याव्यतिरिक्त, ते सकारात्मकता आणि संतुलनाचे प्रतीक देखील मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे फार महत्त्व सांगण्यात आले आहे. मिठाचा संबंध कायम सकारात्मक आणि नकारात्मत उर्जेशी लावला जातो. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, सकारात्मक ठेवण्यासाठी नेहमी कापूर आणि मिठाचे फार महत्त्व सांगितले जाते. पण त्यासाठी वास्तुनुसार मीठ योग्य ठिकाणी आणि दिशेने ठेवणे महत्वाचे आहे, जे सभोवतालच्या उर्जेचे संतुलन राखते. चला जाणून घेऊयात मिठाचे अनेक फायदे आणि ते योग्य पद्धतीने कसे ठेवावे ते

मीठ कसे साठवावे?

ज्योतिषशास्त्रात, मीठ चंद्र आणि शनिशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर ते योग्यरित्या साठवले तर ते घरात शुभ उर्जेचा सतत प्रवाह राखते. वास्तु तज्ज्ञांच्यामते मीठ नेहमी काचेच्या, सिरेमिक किंवा स्टीलच्या तेही झाकण असलेल्या भांड्यात साठवावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. तथापि, लोखंडी किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात मीठ साठवल्याने अशुभ परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तणाव, संघर्ष आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

मीठ कोणत्या दिशेला ठेवावे?

धार्मिक मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात मीठ कोणत्या दिशेने साठवले जाते हे देखील महत्त्वाचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते आग्नेय दिशेला मीठ साठवणे शुभ मानले जाते. या ठिकाणी मीठ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य टिकते आणि आजारांपासून आराम मिळतो.

चुकूनही मीठ असे ठेवू नका

असे म्हटले जाते की मीठ उघड्या भांड्यात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. यामुळे कुटुंबात कलह, वाद आणि आर्थिक संकट येऊ शकते. म्हणून नेहमी स्वच्छ, झाकलेल्या भांड्यात मीठ साठवावे. शास्त्रात असेही म्हटले आहे की मीठ हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे आणि ते योग्यरित्या साठवल्याने घरात धन आणि समृद्धी वाढते.

काचेच्या वाटीत जाडे मीठ किंवा पिंक सॉल्ट ठेवणे़

तसेच घराच्या एका कोपऱ्यात किंवा दाराच्या जवळ तुम्ही जाडे म्हणजे समुद्री मिठाची वाटी किंवा पिंक सॉल्टची वाटी ठेऊ शकता. ज्यामुळे घरात येणारी नकारात्मकता त्या मिठाच्या रुपाने शोषली जाईल आणि घरात प्रवेश करणार नाही. दोन ते तीन दिवसांनी हे मिठ बाथरुममध्ये टाकून द्यावे. पण असे कुठेही बाहेर फेकू नये.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.