AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : वाईट काळात या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या सुटेल

आचार्य चाणक्य यांनी त्यांचे सर्व अनुभव नीतिशास्त्र नावाच्या ग्रंथात लिहिले होते. त्यांच्या मते, वाईट वेळेवर मात करण्यासाठी धैर्य असले पाहिजे. चाणक्य यांनी नैतिकतेमध्ये अशा तीन गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या लक्षात ठेवूवन एखादी व्यक्ती वाईट वेळेचा सामना करु शकते. चाणक्या यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने वाईट काळात या तीन गोष्टी कधीही विसरु नयेत. संकटाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घ्या

Chanakya Niti : वाईट काळात या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या सुटेल
CHANAKYA-NITI
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे कुशल रणनीतिकार होते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला रणनीतिने राजा बनण्यास मदत केली. त्यांना रणनीति राजकारण आणि अर्थशास्त्राचे कुशल जाणकार मानले जाते. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली. चाणक्य यांनी कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानली नाही.

चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीला कठीण परिस्थितीत आपली शक्ती, संयम आणि सकारात्मकता दाखवावी लागते. आचार्य चाणक्य यांनी त्यांचे सर्व अनुभव नीतिशास्त्र नावाच्या ग्रंथात लिहिले होते. त्यांच्या मते, वाईट वेळेवर मात करण्यासाठी धैर्य असले पाहिजे. चाणक्य यांनी नैतिकतेमध्ये अशा तीन गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या लक्षात ठेवूवन एखादी व्यक्ती वाईट वेळेचा सामना करु शकते. चाणक्या यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने वाईट काळात या तीन गोष्टी कधीही विसरु नयेत. संकटाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घ्या –

संयम ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट काळात संयम ठेवला पाहिजे. संकटाच्या वेळी बहुतेक लोकांचे मन विचलित आणि अस्वस्थ होते. या कठीण काळात कुटुंबातील सदस्यांना आधार दिला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या वाईट काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. चाणक्य म्हणतात की, संयम बाळगल्यास एखादी व्यक्ती शक्य तितक्या लवकर वाईट काळातून सावरु शकते.

सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारा

आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने कठीण काळातही सकारात्मक विचार ठेवावा. सकारात्मक विचार तुम्हाला वाईट काळात लढण्यास मदत करतात. एखाद्याने कधीही वाईट विचार करु नये की तो एकटा काय करु शकतो. या कठीण काळात एखाद्याने संपूर्ण सामर्थ्याने संकट्याने सामना केला पाहिजे. वाईट वेळ आली की जो माणूस अडचणीशी लढतो, तो नेहमी जिंकतो.

शत्रूविरुद्ध रणनीति आखा

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या वाईट काळाबद्दल आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि रणनीति तयार केली पाहिजे. एखाद्याने वाईट वेळेकडे एक परीक्षा म्हणून बघितले पाहिजे आणि जिंकण्यासाठी ठोस रणनीति आखली पाहिजे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर तुम्हाला सन्मान प्रिय असेल तर आजच या 3 सवयी सोडा

Chanakya Niti : या 3 गोष्टींमध्ये संयम बाळगणे अति आवश्यक असते, अन्यथा मोठं नुकसान भोगावं लागू शकते…

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.