AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या व्यक्तींशी नेहमी संतुलित व्यवहार ठेवावा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्रात पारंगत असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आपली धोरणे लोकांच्या हितासाठी वापरली. आचार्य चाणक्यांनी लिहिलेले अनेक धर्मग्रंथ लोकांना यशाचा मूळ मंत्रच शिकवत नाहीत तर त्यांना योग्य मार्गदर्शनही करतात. त्यांच्या नीतिमत्तेत असलेल्या गोष्टी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

Chanakya Niti | या व्यक्तींशी नेहमी संतुलित व्यवहार ठेवावा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
आचार्य चाणक्य यांनी ज्या ठिकाणी दुष्ट लोक राहतात तिथून निघून गेलेच चांगलं. ही तुमची सूबुद्धी आहे. दुष्ट लोक कधीही विश्वासार्ह नसतात, ते तुमचे कधीही नुकसान करू शकतात. त्यामुळे असे ठिकाण सोडण्यातच शहाणपणा आहे.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 28, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्रात पारंगत असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आपली धोरणे लोकांच्या हितासाठी वापरली. आचार्य चाणक्यांनी लिहिलेले अनेक धर्मग्रंथ लोकांना यशाचा मूळ मंत्रच शिकवत नाहीत तर त्यांना योग्य मार्गदर्शनही करतात. त्यांच्या नीतिमत्तेत असलेल्या गोष्टी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. चाणक्या यांनी आपल्या नीतिशास्त्रातील अनेक मुख्य मुद्दे समोर आणले. त्यापैकी नाते, मैत्री, शत्रू, पैसा, कुटुंब, पत्नी, व्यवसाय आणि इतर अनेक गोष्टी सखोलपणे सांगितल्या.

जरी, आचार्य चाणक्यांची धोरणे खूप कठोर असली तरी तरीही ते तर्कसंगत आहेत आणि ते सत्याची जाणीव करवून देतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा काही लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांच्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

त्यांनी आपल्या नीतिद्वारे सांगितले आहे की असे काही लोक आहेत ज्यांच्यासोबत नेहमीच संतुलित वागणूक ठेवावी. त्यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की अशा व्यक्तींपासून, गोष्टींपासून त्याच्यापासून फारसे अंतरही ठेवू नये आणि अधिक जवळीकही ठेवू नये.

शक्तिशाली माणूस –

आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही शक्तिशाली व्यक्तीच्या जास्त जवळही राहू नये किंवा अधिक अंतर ठेवू नका. कारण, जर तुम्ही त्यांच्या जवळ गेलात तर त्या व्यक्तीच्या वर्चस्वामुळे तुम्हाला त्याच्या हाताखाली काम करावे लागेल आणि जर तुम्ही अंतर ठेवले तर तुम्हाला त्याच्याकडून सर्व प्रकारच्या सुविधा मिळू शकणार नाहीत. अशा लोकांशी संतुलित वागणूक ठेवावी.

आग –

आचार्य चाणक्य म्हणतात की, अग्नी पेटवताना किंवा आगीचं कोणतेही काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही आगीपासून खूप दूर असाल तर अन्न शिजवता येत नाही आणि जर तुम्ही आगीच्या खूप जवळ असाल तर तुम्हाला ईजा होऊ शकते. त्यामुळे अग्नीबरोबरच समतोल राखला पाहिजे.

स्त्री –

आचार्य चाणक्य म्हणतात की पुरुषाने स्त्रीशी नेहमी संतुलित वागणूक ठेवावी. जर तुम्ही स्त्रीच्या खूप जवळ गेलात तर तुम्हाला मत्सर किंवा अपमानाला सामोरे जावे लागू शकते. परंतु जर तुम्ही जास्त अंतर ठेवले तर तुम्हाला त्यांच्या द्वेषालाही सामोरे जावे लागू शकते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? त्यांच्या भविष्याबाबत संभ्रमात आहात का?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश