AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या व्यक्तींशी नेहमी संतुलित व्यवहार ठेवावा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्रात पारंगत असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आपली धोरणे लोकांच्या हितासाठी वापरली. आचार्य चाणक्यांनी लिहिलेले अनेक धर्मग्रंथ लोकांना यशाचा मूळ मंत्रच शिकवत नाहीत तर त्यांना योग्य मार्गदर्शनही करतात. त्यांच्या नीतिमत्तेत असलेल्या गोष्टी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

Chanakya Niti | या व्यक्तींशी नेहमी संतुलित व्यवहार ठेवावा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
आचार्य चाणक्य यांनी ज्या ठिकाणी दुष्ट लोक राहतात तिथून निघून गेलेच चांगलं. ही तुमची सूबुद्धी आहे. दुष्ट लोक कधीही विश्वासार्ह नसतात, ते तुमचे कधीही नुकसान करू शकतात. त्यामुळे असे ठिकाण सोडण्यातच शहाणपणा आहे.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 28, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्रात पारंगत असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आपली धोरणे लोकांच्या हितासाठी वापरली. आचार्य चाणक्यांनी लिहिलेले अनेक धर्मग्रंथ लोकांना यशाचा मूळ मंत्रच शिकवत नाहीत तर त्यांना योग्य मार्गदर्शनही करतात. त्यांच्या नीतिमत्तेत असलेल्या गोष्टी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. चाणक्या यांनी आपल्या नीतिशास्त्रातील अनेक मुख्य मुद्दे समोर आणले. त्यापैकी नाते, मैत्री, शत्रू, पैसा, कुटुंब, पत्नी, व्यवसाय आणि इतर अनेक गोष्टी सखोलपणे सांगितल्या.

जरी, आचार्य चाणक्यांची धोरणे खूप कठोर असली तरी तरीही ते तर्कसंगत आहेत आणि ते सत्याची जाणीव करवून देतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा काही लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांच्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

त्यांनी आपल्या नीतिद्वारे सांगितले आहे की असे काही लोक आहेत ज्यांच्यासोबत नेहमीच संतुलित वागणूक ठेवावी. त्यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की अशा व्यक्तींपासून, गोष्टींपासून त्याच्यापासून फारसे अंतरही ठेवू नये आणि अधिक जवळीकही ठेवू नये.

शक्तिशाली माणूस –

आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही शक्तिशाली व्यक्तीच्या जास्त जवळही राहू नये किंवा अधिक अंतर ठेवू नका. कारण, जर तुम्ही त्यांच्या जवळ गेलात तर त्या व्यक्तीच्या वर्चस्वामुळे तुम्हाला त्याच्या हाताखाली काम करावे लागेल आणि जर तुम्ही अंतर ठेवले तर तुम्हाला त्याच्याकडून सर्व प्रकारच्या सुविधा मिळू शकणार नाहीत. अशा लोकांशी संतुलित वागणूक ठेवावी.

आग –

आचार्य चाणक्य म्हणतात की, अग्नी पेटवताना किंवा आगीचं कोणतेही काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही आगीपासून खूप दूर असाल तर अन्न शिजवता येत नाही आणि जर तुम्ही आगीच्या खूप जवळ असाल तर तुम्हाला ईजा होऊ शकते. त्यामुळे अग्नीबरोबरच समतोल राखला पाहिजे.

स्त्री –

आचार्य चाणक्य म्हणतात की पुरुषाने स्त्रीशी नेहमी संतुलित वागणूक ठेवावी. जर तुम्ही स्त्रीच्या खूप जवळ गेलात तर तुम्हाला मत्सर किंवा अपमानाला सामोरे जावे लागू शकते. परंतु जर तुम्ही जास्त अंतर ठेवले तर तुम्हाला त्यांच्या द्वेषालाही सामोरे जावे लागू शकते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? त्यांच्या भविष्याबाबत संभ्रमात आहात का?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...