AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 6 लोकांना झोपेतून जागे करण्यात जराही संकोच करु नये, आचार्य चाणक्य काय सांगतात

जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल तर आपण त्याला उठवण्यात संकोच करतो (Acharya Chanakya), जेणेकरुन त्याला राग येऊ नये किंवा त्याला काही त्रास होऊ नये.

Chanakya Niti | या 6 लोकांना झोपेतून जागे करण्यात जराही संकोच करु नये, आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya-Chanakya
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 25, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई : जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल तर आपण त्याला उठवण्यात संकोच करतो (Acharya Chanakya), जेणेकरुन त्याला राग येऊ नये किंवा त्याला काही त्रास होऊ नये. परंतु कधीकधी काही लोकांना जागे करणे त्यांच्या हिताचे असते. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांना जागृत करण्यात अजिबात संकोच करु नये, कारण त्यांना जागं करण्यात त्यांचाच फायदा आहे. ते सहा लोक कोण आहेत ते जाणून घ्या (Acharya Chanakya Said Do Not Hesitate To Wake Up These 6 People Immediately In Chanakya Niti)-

1. विद्यार्थी :

विद्यार्थ्याचे आयुष्य संयमित असले पाहिजे. त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या आहार आणि झोपेबद्दल सर्व काही एका निश्चित प्रमाणात हवं. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी 6 तास हा वेळ पुरेसा मानला जातो. जर तो जास्त झोपत असेल तर त्याला जागं करण्यात अजिबात संकोच करु नये.

2. चौकीदार :

दुकान, कारखाना किंवा घराचा चौकीदार तेथील जागेची सुरक्षा करण्यासाठी ठेवला जातो. अशा परिस्थितीत, जर तो कामादरम्यान झोपत असेल तर, त्याला उठविण्यास अजिबात संकोच करू नये. चौकीदार जर झोपी गेला तर त्या जागेवर चोरी वगैरेची भीती असते, तसेच या सवयीमुळे त्याची जबाबदारीदेखील काढून घेतली जाऊ शकते.

3. घाबरलेली व्यक्ती :

जर एखादी व्यक्ती झोपेत एखादे भयानक स्वप्न पाहून घाबरुन गेली असेल, तर तिला जागे करण्याच अजिबात संकोच करु नका. ताबडतोब तिला हलवून जागे करा आणि पाणी द्या. जेणेकरुन त्याचे स्वप्न भंग होईल आणि त्याला शांती मिळेल.

4. नोकर :

जर एखादा नोकर कामाच्या दरम्यान झोपी गेला असेल तर त्याला जागं केलं पाहिजे. अन्यथा त्याचे काम पूर्ण होणार नाही आणि यामुळे केवळ त्याच्यासाठी समस्या निर्माण होतील.

5. प्रवासी :

प्रवासादरम्यान एखादा प्रवासी झोपला असेल तर त्याला जागं करा. अन्यथा, कोणीही या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो आणि त्याचे सामान चोरु शकतो.

6. भुकेलेला व्यक्ती :

भुकेलेला व्यक्ती उपाशीच झोपला असेल तर त्याला जागं करावे आणि जोवायला द्यावे. असे केल्याने, त्याची भूक मिटेल, तसेच आपल्याला खूप चांगले वाटेल.

Acharya Chanakya Said Do Not Hesitate To Wake Up These 6 People Immediately In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...