AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ही 3 सुख असतात, तो स्वर्गाचीही इच्छा करत नाही, कारण…

आचार्य मानतात की कलियुगातील लोकांचे सर्वात मोठे दुःख हे त्यांची मुले आहेत. आजच्या काळात जर मुलं चुकीच्या मार्गावर जात असतील, पालकांचे ऐकत नसेल, त्यांचा अपमान करत असेल तर ते सर्वात मोठे दु: ख आहे. म्हणूनच, जर तुमचे मूल आज्ञाधारक आणि सुसंस्कृत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजेत.

Chanakya Niti | ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ही 3 सुख असतात, तो स्वर्गाचीही इच्छा करत नाही, कारण...
दुराचारी, कुदृष्टी व्यक्ती आणि वाईट ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये. असे लोक तुम्हाला केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच अडचणीत टाकतात.
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 8:33 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य कुशाग्र बुद्धीने संपन्न होते. ते अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादीचे जाणकार होते, तसेच त्यांना सामाजिक बाबींची सखोल समज होती. आचार्यांचे आयुष्य अनेक अडचणींतून गेले, पण त्यांनी त्यांच्या प्रत्येक संघर्षातून प्रेरणा घेतली. आयुष्यभर आचार्य आपल्या अनुभवांच्या बळावर लोकांना मदत करत राहिले आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत राहिले. आचार्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या आजही लोकांचे भविष्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.

जर तुम्ही आचार्यांचे गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्हाला त्यांचे शब्द कठोर आणि थोडे कडू वाटतील पण प्रत्यक्षात त्या तुम्हाला जीवनातील वास्तवाची जाणीव करुन देणाऱ्या गोष्टी आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आचार्यांची नीति नीट समजून घेतली आणि ती आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला तर तो आपले जीवन खूप सोपे करु शकतो. आचार्यांनी सांगितलेल्या जीवनातील सर्वात मोठे सुख कोणते आहेत ते जाणून घेऊया? ज्या व्यक्तीला हे सुख आहे, तो स्वर्गाचीही इच्छा करत नाही.

1. आचार्य मानतात की कलियुगातील लोकांचे सर्वात मोठे दुःख हे त्यांची मुले आहेत. आजच्या काळात जर मुलं चुकीच्या मार्गावर जात असतील, पालकांचे ऐकत नसेल, त्यांचा अपमान करत असेल तर ते सर्वात मोठे दु: ख आहे. म्हणूनच, जर तुमचे मूल आज्ञाधारक आणि सुसंस्कृत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजेत. तुमची मुले तुमच्या म्हातारपणी तुमचा आधार आहेत. अशा लोकांसाठी पृथ्वीवर यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही.

2. असे म्हटले जाते की एक स्त्री घर बनवू शकते आणि उध्वस्तही करु शकते. ज्या व्यक्तीची सुसंस्कृत आणि आज्ञाधारक पत्नी आहे, ती व्यक्ती जगातील सर्वोत्तम लोकांपैकी एक आहे. अशी पत्नी संपूर्ण कुटुंबाला सांभाळते आणि संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवते. पत्नीच्या चांगल्या आचरणामुळे पतीचा आदरही खूप वाढतो. अशी पत्नी कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीला एकटे सोडत नाही. अशा लोकांनी प्रत्येक क्षणी परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत.

3. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला कितीही मिळाले तरी पण जर त्याला मनाची शांती मिळाली नाही तर तो अस्वस्थ राहतो. म्हणून, ज्यांना मानसिक शांती लाभली आहे, ते जीवनातील प्रत्येक परिस्थिती सहजपणे पार करतात आणि समाधानी राहतात. प्रत्येकाला आत्म-समाधानाचा दर्जा मिळत नाही. म्हणून, ज्याच्याकडे हे गुण आहेत त्याच्यासाठी ही पृथ्वी स्वर्गापेक्षा कमी नाही.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | मुलांना वाईट गोष्टी शिकवू शकतात आई-वडिलांच्या या सवयी, मुलांसमोर वागताना काळजी घ्या

Chanakya Niti | निरोगी राहायचं असेल तर ही औषधी नेहमी आपल्या जवळ ठेवावी, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.