AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आर्थिक संकटाचे संकेत देतात या 3 गोष्टी, आधीच सावध व्हा

शास्त्रामध्ये सर्व गोष्टींचा शुभ आणि अशुभ फळांशी संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन एखाद्या व्यक्तीने त्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही अनुचित घटनेपासून आपले प्राण वाचवावे. आचार्य चाणक्य यांनी लोककल्याणाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला येणाऱ्या संकटाबद्दल आधीच सूचना देत असतात.

Chanakya Niti | आर्थिक संकटाचे संकेत देतात या 3 गोष्टी, आधीच सावध व्हा
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 7:42 AM
Share

मुंबई : शास्त्रामध्ये सर्व गोष्टींचा शुभ आणि अशुभ फळांशी संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन एखाद्या व्यक्तीने त्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही अनुचित घटनेपासून आपले प्राण वाचवावे. आचार्य चाणक्य यांनी लोककल्याणाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला येणाऱ्या संकटाबद्दल आधीच सूचना देत असतात. जर एखाद्या व्यक्तीला ती चिन्हे वेळेत समजली तर तो स्वतःला सर्व समस्यांपासून वाचवू शकतो आणि त्यांच्याशी सामना करण्याची तयारी करु शकतो.

आचार्य चाणक्य यांनी दिलेली चिन्हे जाणून घ्या जे येणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल चेतावणी देतात.

1. तुळशीच्या वनस्पतीला शास्त्रात आदरणीय मानले गेले आहे आणि ते घरात ठेवा असे सांगितले गेले आहे. आचार्यांचे असे मत होते की जर घरात तुळशीचे रोप असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी आणि ते सुकू देऊ नये. तुळशीचे झाड सुकणे हे येणारे आर्थिक संकट दर्शवते.

2. जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे. काच वारंवार तुटणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. याशिवाय, तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा नकारात्मकता वाढते.

3. ज्या घरात वडिलांचा अपमान होतो तेथे नकारात्मकता राहते. आर्थिक अडचणी येतात आणि घरातील सुख-शांती नाहीशी होते. त्यामुळे तुमच्या घरातील कोणताही सदस्य जाणूनबुजून किंवा नकळत वडिलांचा अपमान करत असेल तर त्यांना समजावून सांगा. त्यांचा आदर करा आणि घरात आनंद आणण्यासाठी आशीर्वाद मिळवा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशा व्यक्तींकडे कधीही लक्ष्मी नांदत नाही, नेहमी राहतात कंगाल

Chanakya Niti | पालकांनी मुलांसोबत कोणत्या वयात कसं वागावं, चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.