AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठला मार्ग दिसत नाही तेव्हा आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला मदत करतील

जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते तेव्हा काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्याला समजत नाही (Chanakya Niti). म्हणूनच एखादी व्यक्ती निर्णयापर्यंत सहज पोहोचू शकत नाही. अनेक वेळा व्यक्ती चुकीचे निर्णय घेते, यामुळे स्वतःचे मोठे नुकसान होते. अशा वेळी आचार्य चाणक्य यांच्या काही गोष्टी तुमचे मार्गदर्शन करु शकतात.

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठला मार्ग दिसत नाही तेव्हा आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला मदत करतील
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 7:50 AM
Share

मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते तेव्हा काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्याला समजत नाही (Chanakya Niti). म्हणूनच एखादी व्यक्ती निर्णयापर्यंत सहज पोहोचू शकत नाही. अनेक वेळा व्यक्ती चुकीचे निर्णय घेते, यामुळे स्वतःचे मोठे नुकसान होते. अशा वेळी आचार्य चाणक्य यांच्या काही गोष्टी तुमचे मार्गदर्शन करु शकतात. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये अशा बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या कठीण काळात एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे शिकवतात (Acharya Chanakyas Advise Will Show You The Correct Path During Hard Times Know These Five Things From Chanakya Niti).

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा संकट येते तेव्हा आव्हाने वाढतात आणि संधी कमी असतात. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीने जागृत रहावे आणि त्या संधींवर लक्ष ठेवले पाहिजे कारण अशा वेळी छोटीशी चूक देखील आपले मोठे नुकसान करु शकते.

2. आचार्य चाणक्य म्हणायचे की जर एखादी व्यक्ती संकटावर मात करण्यासाठी आधीपासूनच काही तयारी करत असेल तर ती सहज कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकते. म्हणून, प्रत्येक व्यक्तीने पैसे, अन्न इत्यादींचा साठा ठेवला पाहिजे. वाईट काळात ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आचार्य चाणक्य यांनी संपत्तीचे खरा मित्र म्हणून वर्णन केले आहे.

3. संकटाच्या वेळी आपले प्रथम कर्तव्य आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. म्हणूनच, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे पूर्ण समर्थन केले पाहिजे. त्यांच्यावर काही अडचण आल्यास त्यांना त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

4. चाणक्य नीतिच्या मते, तुम्ही कितीही मोठ्या संकटात सापडला तरी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपण प्रत्येक परिस्थितीचा सहज सामना करण्यास सक्षम असाल. आपले शरीर आणि मन दोन्ही चांगले कार्य करेल.

5. संकटात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामाबद्दल विचार करा. त्यानंतर केवळ ठोस रणनीतिने काम करा. जी व्यक्ती संपूर्ण रणनीतिसह पुढे जाते, ती प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करते.

Acharya Chanakyas Advise Will Show You The Correct Path During Hard Times Know These Five Things From Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.