AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, स्त्रीचे सौंदर्य हे तिचे सामर्थ्य आहे आणि त्याच्या बळावर ती काहीही साध्य करु शकते. तर एक ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानामुळे सर्वत्र आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त करतो, त्याच प्रकारे श्रीमंत व्यक्ती संपत्तीच्या बळावर मोठ्या संकटांवरही सहज मात करु शकतो.

Chanakya Niti | स्त्रीचे असे सौंदर्य आणि ज्ञानी व्यक्तीचे असे ज्ञान व्य​र्थ आहे, आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 26, 2021 | 8:02 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, स्त्रीचे सौंदर्य हे तिचे सामर्थ्य आहे आणि त्याच्या बळावर ती काहीही साध्य करु शकते. तर एक ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानामुळे सर्वत्र आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त करतो, त्याच प्रकारे श्रीमंत व्यक्ती संपत्तीच्या बळावर मोठ्या संकटांवरही सहज मात करु शकतो. पण काही विशिष्ट परिस्थितीत चाणक्य यांनी या सर्व गोष्टी निरर्थक मानल्या आहेत. चाणक्य नीति काय म्हणते जाणून घेऊया (Acharya Chanakya Said These Type Of Beauty Of Woman And Knowledge Of A Vise Man Are Useless Under Some Circumstances In Chanakya Niti) –

1. आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रीचे सौंदर्य निःसंशयपणे तिचे सामर्थ्य आहे. परंतु जेव्हा स्त्री सुसंस्कृत आणि पुण्यवान असेल तेव्हाच त्या सौंदर्याचा अर्थ असतो. सद्गुणांशिवाय सौंदर्य हा एक भ्रम आहे. ती कधीही आपला प्रभाव जास्त काळ टिकवू शकत नाही.

2. त्याचप्रमाणे ज्ञान ते महासागर आहे, जे कितीही मिळवले तरीही कमीच असते. म्हणून, व्यक्तीने नेहमी ज्ञान ग्रहण करत राहिले पाहिजे. परंतु जर आपले ज्ञान एखाद्या लक्ष्याशी संबंधित असेल तर ते फायदेशीर आहे परंतु ज्याचे कोणतेही ध्येय नाही, अशी व्यक्ती कितीही ज्ञानी असली तरीही त्याचे सर्व ज्ञान व्यर्थ मानले जाते. म्हणून, आपले ज्ञान ध्येयाशी जोडा आणि त्याने इतरांचे कल्याण करा.

3. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या उच्च कुटुंबातील व्यक्ती निम्न स्तराचे वर्तन करत असेल तर ती नक्कीच एक दिवस आपल्या कुटुंबाच्या नाशाचं कारण बनतो. कारण एखाद्या व्यक्तीचे आचरण त्याला उच्च आणि निम्न पातळीचे बनवते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपले संस्कार कधीही विसरु नका.

4. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने आपला पैसा चांगल्या कामांसाठी वापरला पाहिजे. शास्त्रात श्रीमंतीचे तीन वर्गात वर्णन केले गेले आहे. प्रथम भोग, दुसरे दान आणि तिसरे नाश. याचा अर्थ असा की जर पैशांचा उपयोग भोग, दान करण्यासाठी केला तर घरात समृद्धी नांदते. परंतु जर या दोन्ही कामांमध्ये पैसे वापरले नसेल तर त्या पैशांचा नाश होणे निश्चित आहे.

Acharya Chanakya Said These Type Of Beauty Of Woman And Knowledge Of A Vise Man Are Useless Under Some Circumstances In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक