AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत आणि जेव्हा त्या कर्मांचे फळ शिक्षेच्या रुपात मिळते तेव्हा ते दुसर्‍याला दोष देतात किंवा देवाला दोष देतात (According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये एखाद्या व्यक्तीने विचार करुनच कर्म करण्याच्या सूचना दिल्या आहे. आचार्य यांची धोरणे कठोर आहेत, पण ती त्यांच्या आयुष्यातील संघर्षातून मिळविलेले अनुभव आहेत. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर आपल्या अनुभवांद्वारे लोकांचे मार्गदर्शन केले. आजच्या जगातही त्यांचे विचार लोकांसाठी फायद्याचे ठरतात. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात आचार्य यांचे धोरण स्वीकारले तर त्याला सर्व दु:खापासून मुक्ती मिळू शकते.

“ज्या व्यक्तीला त्याच्या कर्मांची जाणिव नसते तो डोळे असून आंधळ्या माणसासारखा असतो” – आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येकाला त्याच्या कर्माचे भान असते, म्हणून असे करण्यापूर्वी याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. जे लोक परिणामाबद्दल विचार करीत नाहीत अशा लोकांना भविष्यात नक्कीच त्रास सहन करावा लागतो. असे लोक डोळे असूनही आंधळे असतात आणि त्यांच्या जीवनाचा अंधकार कधीही संपू शकत नाही.

जेव्हा आपण कोणत्याही कर्माच्या परिणामाचा आधीच विचार करतो, तेव्हा आपल्याला भविष्यातील चांगल्या आणि वाईट परिस्थितीची कल्पना येते आणि आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करता. ज्या व्यक्तीने कर्माच्या परिणामांचा विचार केला नाही, तो अनुकूल परिस्थितीत आनंदाच्या भरात आपले संतुलन गमावतो आणि नंतर काही चुका करतो. तर वाईट परिस्थिती तो इतका अस्वस्थ होतो की चुकीचा निर्णय घेऊन बसतो. दोन्ही परिस्थिती कशा हाताळायच्या हे त्याला माहित नाही. म्हणूनच, जीवनात आपण जे काही करता ते विचारपूर्वक करा आणि त्याच्या परिणामाबद्दल विचार करा.

According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.