AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत आणि जेव्हा त्या कर्मांचे फळ शिक्षेच्या रुपात मिळते तेव्हा ते दुसर्‍याला दोष देतात किंवा देवाला दोष देतात (According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये एखाद्या व्यक्तीने विचार करुनच कर्म करण्याच्या सूचना दिल्या आहे. आचार्य यांची धोरणे कठोर आहेत, पण ती त्यांच्या आयुष्यातील संघर्षातून मिळविलेले अनुभव आहेत. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर आपल्या अनुभवांद्वारे लोकांचे मार्गदर्शन केले. आजच्या जगातही त्यांचे विचार लोकांसाठी फायद्याचे ठरतात. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात आचार्य यांचे धोरण स्वीकारले तर त्याला सर्व दु:खापासून मुक्ती मिळू शकते.

“ज्या व्यक्तीला त्याच्या कर्मांची जाणिव नसते तो डोळे असून आंधळ्या माणसासारखा असतो” – आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येकाला त्याच्या कर्माचे भान असते, म्हणून असे करण्यापूर्वी याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. जे लोक परिणामाबद्दल विचार करीत नाहीत अशा लोकांना भविष्यात नक्कीच त्रास सहन करावा लागतो. असे लोक डोळे असूनही आंधळे असतात आणि त्यांच्या जीवनाचा अंधकार कधीही संपू शकत नाही.

जेव्हा आपण कोणत्याही कर्माच्या परिणामाचा आधीच विचार करतो, तेव्हा आपल्याला भविष्यातील चांगल्या आणि वाईट परिस्थितीची कल्पना येते आणि आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करता. ज्या व्यक्तीने कर्माच्या परिणामांचा विचार केला नाही, तो अनुकूल परिस्थितीत आनंदाच्या भरात आपले संतुलन गमावतो आणि नंतर काही चुका करतो. तर वाईट परिस्थिती तो इतका अस्वस्थ होतो की चुकीचा निर्णय घेऊन बसतो. दोन्ही परिस्थिती कशा हाताळायच्या हे त्याला माहित नाही. म्हणूनच, जीवनात आपण जे काही करता ते विचारपूर्वक करा आणि त्याच्या परिणामाबद्दल विचार करा.

According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.