AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी रचलेले महान ग्रंथ म्हणजे चाणक्य नीति. या पुस्तकात आचार्य यांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखादी यांचे अनुसरण करत असेल तो तर कितीही मोठ्या संकटांवर सहजपणे विजय मिळवू शकतो.

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी रचलेले महान ग्रंथ म्हणजे चाणक्य नीति. या पुस्तकात आचार्य यांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखादी यांचे अनुसरण करत असेल तो तर कितीही मोठ्या संकटांवर सहजपणे विजय मिळवू शकतो. अडचणींमध्ये तोडगा काढू शकतो आणि बर्‍याच अडचणींना थांबवू शकतो. एका श्लोकात आचार्य यांनी सांगितले आहे की माणसालाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता आहे. जर एखाद्या व्यक्तीला हे समजले तर आयुष्य अधिक चांगले होऊ शकते (Know Who Is The True Friend Biggest Enemy And Biggest disease Of Human According To Chanakya Niti).

1. आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, व्यक्तीचा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ मित्र दुसरा कोणी नाही. एक शहाणा माणूस जगात येण्यामागचा त्याचा हेतू चांगल्या प्रकारे समजतो आणि आपले कार्य चांगल्या प्रकारे करतो. तो सांसारिक गोष्टींमध्ये कधीही गुंतत नाही. त्याचे ज्ञान त्याला कठीण काळात योग्य मार्ग दाखवते. अशा व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो.

2. मोह हा माणसाचा सर्वात मोंठा शत्रू आहे. यामुळे व्यक्ती पक्षपाती बनतो. मोह व्यक्तीला सांसारिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवतो. त्याला जीवनाचा मूळ हेतू समजू देत नाही. अशी व्यक्ती इतरांकडून अपेक्षा ठेवतो आणि त्याला नेहमी दु:ख मिळते. जर तुम्हाला आयुष्य सार्थक करायचे असेल तर स्वत:ला मोहापासून दूर ठेवा.

3. मनुष्याचा सर्वात मोठा आजार म्हणजे काम वासना आहे. असा माणूस कोणत्याही कामात आपले मन केंद्रित करु शकत नाही. तो नेहमी त्याच गोष्टीचा विचार करतो. लैंगिकतेबद्दल वासना एखाद्या व्यक्तीला मानसिकरित्या आजारी करते आणि विचार करण्याची क्षमता दूर करते.

4. रागापेक्षा वाईट आग नाही. राग ही अशी आग आहे जी एखाद्या व्यक्तीला आतून पेटवते आणि त्याला पोकळ बनवते. त्याची बुद्धी भ्रष्ट करते. रागाच्या भरात, एखादी व्यक्ती बर्‍याचदा चुकीचे निर्णय घेतो, ज्यासाठी नंतर त्याला पश्चात्ताप करावा लागतो.

Know Who Is The True Friend Biggest Enemy And Biggest disease Of Human According To Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.