Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी रचलेले महान ग्रंथ म्हणजे चाणक्य नीति. या पुस्तकात आचार्य यांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखादी यांचे अनुसरण करत असेल तो तर कितीही मोठ्या संकटांवर सहजपणे विजय मिळवू शकतो.

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 7:40 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी रचलेले महान ग्रंथ म्हणजे चाणक्य नीति. या पुस्तकात आचार्य यांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखादी यांचे अनुसरण करत असेल तो तर कितीही मोठ्या संकटांवर सहजपणे विजय मिळवू शकतो. अडचणींमध्ये तोडगा काढू शकतो आणि बर्‍याच अडचणींना थांबवू शकतो. एका श्लोकात आचार्य यांनी सांगितले आहे की माणसालाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता आहे. जर एखाद्या व्यक्तीला हे समजले तर आयुष्य अधिक चांगले होऊ शकते (Know Who Is The True Friend Biggest Enemy And Biggest disease Of Human According To Chanakya Niti).

1. आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, व्यक्तीचा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ मित्र दुसरा कोणी नाही. एक शहाणा माणूस जगात येण्यामागचा त्याचा हेतू चांगल्या प्रकारे समजतो आणि आपले कार्य चांगल्या प्रकारे करतो. तो सांसारिक गोष्टींमध्ये कधीही गुंतत नाही. त्याचे ज्ञान त्याला कठीण काळात योग्य मार्ग दाखवते. अशा व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो.

2. मोह हा माणसाचा सर्वात मोंठा शत्रू आहे. यामुळे व्यक्ती पक्षपाती बनतो. मोह व्यक्तीला सांसारिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवतो. त्याला जीवनाचा मूळ हेतू समजू देत नाही. अशी व्यक्ती इतरांकडून अपेक्षा ठेवतो आणि त्याला नेहमी दु:ख मिळते. जर तुम्हाला आयुष्य सार्थक करायचे असेल तर स्वत:ला मोहापासून दूर ठेवा.

3. मनुष्याचा सर्वात मोठा आजार म्हणजे काम वासना आहे. असा माणूस कोणत्याही कामात आपले मन केंद्रित करु शकत नाही. तो नेहमी त्याच गोष्टीचा विचार करतो. लैंगिकतेबद्दल वासना एखाद्या व्यक्तीला मानसिकरित्या आजारी करते आणि विचार करण्याची क्षमता दूर करते.

4. रागापेक्षा वाईट आग नाही. राग ही अशी आग आहे जी एखाद्या व्यक्तीला आतून पेटवते आणि त्याला पोकळ बनवते. त्याची बुद्धी भ्रष्ट करते. रागाच्या भरात, एखादी व्यक्ती बर्‍याचदा चुकीचे निर्णय घेतो, ज्यासाठी नंतर त्याला पश्चात्ताप करावा लागतो.

Know Who Is The True Friend Biggest Enemy And Biggest disease Of Human According To Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.