Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्यात विलक्षण प्रतिभा होती. ते एक कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, राजकारणी आणि योग्य गुरु होते आणि त्यांना सर्व विषयांचे ज्ञान होते. ते जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असे. त्यांने आपले ज्ञान आणि अनुभवांना त्यांच्या रचनांमध्ये संग्रहित केले आहे, जेणेकरुन सामान्य लोकांना देखील त्यांचा फायदा होऊ शकेल.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या 'या' 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 7:15 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्यात विलक्षण प्रतिभा होती. ते एक कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, राजकारणी आणि योग्य गुरु होते आणि त्यांना सर्व विषयांचे ज्ञान होते. ते जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असे. त्यांने आपले ज्ञान आणि अनुभवांना त्यांच्या रचनांमध्ये संग्रहित केले आहे, जेणेकरुन सामान्य लोकांना देखील त्यांचा फायदा होऊ शकेल. त्यातील एक रचना म्हणजे चाणक्य नीति. चाणक्य नीतिमध्ये आचार्य यांनी अशा बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या कठीण काळाला सुधारु शकते आणि कुठलीही समस्या उद्भवण्यापूर्वी ती थांबवू शकते. आचार्य यांनी सांगितलेल्या खास गोष्टी येथे जाणून घेऊया (Chanakya Niti These Seven Important Things Of Acharya Chanakya You Should Never Forget) –

1. आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक व्यक्तीला लोभापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. लोभ हा एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा अवगुण मानला जातो. कारण, लोभ एखाद्या व्यक्तीला कोणत्याही स्तरावर घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्याकडून काहीही घडवून आणू शकतो, ज्यामुळे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य खराब होण्याची शक्यता असते.

2. दुसर्‍याचे वाईट केल्याने आपल्या स्वतःचे विचार केवळ प्रदूषित होत नाहीत तर आपला वेळही व्यर्थ जातो. म्हणूनच एखाद्याने इतरांवर कधीही टीका करु नये. आपल्या स्वतःच्या उणिवा पाहण्याऐवजी सुधारण्याचा प्रयत्न करा.

3. सत्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती एखाद्या महान तपस्वीसारखी असते. कारण, शास्त्रांमध्ये सत्य एक महान तपस्या मानली जाते. दुसरीकडे, ज्याचे मन मत्सर आणि द्वेषबुद्धीने कलंकित न होता पूर्णपणे शुद्ध आहे अशा व्यक्तीला कोणत्याही यात्रेची आवश्यकता नाही. सर्वात मोठी तीर्थयात्रे म्हणजे मनाची शुद्धता.

4. आचार्य हे व्यक्तीचा सर्वात मोठा गुण सभ्यता मानतात. एक सज्जन माणूस नेहमीच इतरांचा चांगला विचार करतो.

5. यश हा माणसाचा उत्तम अलंकार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजात अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे त्याचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

6. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे शिक्षण. ही अशी संपत्ती आहे जी कोणी तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. जितके जास्त वितरित केली जाईल तितकी ही संपत्ती वाढेल.

7. ज्या व्यक्तीला समाजात अपयशाला सामोरे जावे लागते, त्या व्यक्तीला मृत्यूपेक्षा दुःखदायक वेदना भोगाव्या लागतात.

Chanakya Niti These Seven Important Things Of Acharya Chanakya You Should Never Forget

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | वाईट काळात खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतात ‘या’ 4 गोष्टी

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.