AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, वर्षभर तिजोरी पैशांनी भरलेली राहील

हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. गुढीपाडवा हा हिंदू पंचागानुसार वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, जे गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यास वर्षभर घरात बरकत राहते.

Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, वर्षभर तिजोरी पैशांनी भरलेली राहील
gudhi padwaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 7:43 PM
Share

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. याच दिवसापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो. महाराष्ट्रासह देशभरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आणि पुरणपोळी करून नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं. येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं, नवीन वर्षामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडवून याव्यात आपली प्रगती व्हावी, अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे उपाय जर गुढीपाडव्याच्या दिवशी केले तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते. उत्तम आरोग्य आणि धन संपदा लाभते अशी मान्यता आहे.चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंघोळ करून देवाची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, एक गोष्ट लक्षात ठेवा वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व आहे. कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. याच दरवाजातून घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे लक्षात ठेवा गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजाची स्वच्छता झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा तांब्या शक्यतो पितळ, तांबा अशा धातूंचा असावा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अशी मान्यता आहे.

या उपायामुळे वर्षभर घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही, तिजोरी पैशांची भरलेली राहते. हातात आलेला पैसा टिकतो, तसेच घराला स्थैर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. या व्यतिरिक्त गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घराला तोरण लावा, मात्र तोरण लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे तोरण कधीही कृत्रिम फुलांचं नसावं. तोरण बनवता झेंडूंच्या फुलांचा आणि अंब्यांच्या पानाचा वापर करावा, यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट हेते, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.