AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात वाळलेल्या तुळशीचं झाडं का ठेवू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. मात्र तरी देखील वाळलेली तुळस घरात ठेवणं अशुभ माण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : घरात वाळलेल्या तुळशीचं झाडं का ठेवू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
tulsi Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 7:37 PM
Share

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं दूर होतात. त्यामुळे घरात तुळशीचं झाड असावच असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. फक्त तुळशीचं झाड लावलं म्हणजे काम झालं असं नाही, तर हिंदू धर्मशास्त्रानुसार दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीची पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावं, तसेच सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा, त्यामुळे आपल्याला अपेक्षित फळ मिळतं. घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. मात्र जरी असं असलं तरी देखील घरात वाळलेली तुळस ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे?

तुळस वाळणे शुभ की अशुभ? घरात असलेली तुळस जर अचानक वाळली तर वास्तुशास्त्रामध्ये त्याला शुभ माण्यात आलं आहे, कारण असं मानलं जातं की जेव्हा तुळस अचानक वाळते, तेव्हा आपल्या घरावरील फार मोठं एखादं संकट टळलं आहे. आपल्या घरावर येणारं संकट हे तुळशीच्या कृपेनं दूर झालं आहे, त्यामुळे तुळस वाळते. त्यामुळे जर अचानक तुळस वाळली तर असं समजावं की आपल्या घरावरील फार मोठं संकट टळलं आहे. जर घरातील तुळस अचानक वाळली तर तिला नमस्कार करावा, तिच्या समोर दिवा लावावा, त्यानंतर ही तुळस वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, किंवा अशा तुळशीपासून माळ तयार करावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वाळलेली तुळस घरात का ठेवू नये- वाळलेली तुळस घरात ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो. जेव्हा तुमच्या घरातील तुळस अचानक वाळते तेव्हा तिच्या जागी नवीन तुळशीचं रोप लावावं, तसेच जी वाळलेली तुळस आहे, तिचं विसर्जन वाहत्या पाण्यात करावं, किंवा तिच्यापासून माळ तयार करावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान.
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....