AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने गमावलं, तर शिवम दुबेने कमावलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने निराशा केली. पण शिवम दुबेने सगळं काही कव्हर केलं.

T20 World Cup 2026: अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने गमावलं, तर शिवम दुबेने कमावलं
T20 World Cup 2026: अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने गमावलं, तर शिवम दुबेने कमावलंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 08, 2026 | 9:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या संधीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनची जोडी जमली आणि त्यांनी 48 चेंडूत 105 धावा केल्या. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 52, संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 आणि इशान किशनने 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. भारताने 16व्या षटकात 3 गडी गमवून 204 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे उर्वरित चार षटकात आरामात 270 धावांपर्यंत मजल मारली जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकली आणि धावगतीला ब्रेक लागला.

सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण झेल बाद झाला. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर धावगती मंदावली. भारतीय संघ 240 धावा करेल की नाही अशी शंका वाटू लागली. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा आक्रमक खेळी करण्यात अपयशी झाले. त्यामुळे 17 व्या षटकात 7, 18व्या षटकात 9 आणि 19व्या षटकात 11 धावा आल्या. 19 व्या षटकात हार्दिक पांड्याची विकेट गेल्याने सिवम दुबे मैदानात आला. या षटकात त्याने दोन चेंडूवर 2 धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर 1 धावा घेतल्याने त्याला शेवटच्या षटकात स्ट्राईक मिळाला.

एका षटकात तीन विकेट घेणारा जेम्स नीशम गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिवम दुबेने चौकार मारला. त्यानंतर सलग 2 षटकार मारले. च्यौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचवा चेंडू मारला आणि आरामात एक धाव घेऊ शकला असता. पण शिवम दुबेने स्ट्राईक स्वत:कडे ठेवला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. या षटकात शिवम दुबेने 24 धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवच्या विकेटनंतर धावगतीला ब्रेक लागला होता. तो सर्व शेवटच्या षटकात शिवम दुबेने कव्हर केला. त्याने 8 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकार मारत नाबाद 26 धावा केल्या.

Follow Us
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान