AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण…

अधिकमास 15 जून रोजी संपणार नाही. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व आहे. असं असातना 19 जूनपासून शुभं कार्य सुरू होतील. पण 25 जुलैपूर्वी शुभ कार्य आटपणं भाग आहे. कारण 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...
15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 12, 2026 | 9:55 PM
Share

ज्येष्ठ अधिकमास सुरू असून 17 मे ते 15 जून असा कालावधी आहे. या महिन्याला पुरूषोत्तम मास असंही संबोधलं जातं. हा महिना भगवान विष्णुंना समर्पित असल्याने त्याला अधिकमास असं बोललं जातं. अधिकमासात पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचं महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्याचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिकमासात विवाह, मुंज, गृहप्रवेस किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. 15 जूनपासून मूळ ज्येष्ठ मास सुरू होईल. त्यामुळे पुन्हा एकदा शुभ कार्य करू शकता. पण 25 जुलै आधी सर्व शुभ कार्य पूर्ण करावी लागणार आहेत. त्याला धार्मिक कारण आहे. 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात म्हणजेच चार महिन्यांच्या कालावधीत अनेक व्रतकैवल्य असतात.

चातुर्मासात काय असतं?

चातुर्मासात सृष्टीचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णु योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णु योगनिद्रा आणि विश्राम अवस्थेत असतात. त्यामुळे चातुर्मासात शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात आरोग्याच्या आणि अध्यात्मिक दृष्टीने ऋतूनुसार आहाराचे कठोर नियमही सांगितले गेले आहेत. या चार महिन्यात वांगी, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असते. चातुर्मास देवशयनी एकदशीपासून सुरू होतो. म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते आणि देवउठनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. पंचांगानुसार, चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होतो. हा कालावधी 119 दिवसांपर्यंत असेल आणि 20 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपेल. 25 जुलैला चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत म्हणजेच 119 दिवसांच्या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात.

अधिकमास संपल्यानंतर शुभ मुहूर्त

अधिकमास संपल्यानंतर 19 जूनपासून शुभ आणि मंगळ कार्य करण्याची सुरूवात होईल. ज्योतिष्यांच्या मते, 19 जूनपासून विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. अधिक मास संपल्यानंतर 19, 21, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून रोजी विवाह मुहूर्त आहे. तर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात 4 शुभ मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 1, 6, 7 आणि 11 जुलैला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...