AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण…

अधिकमास 15 जून रोजी संपणार नाही. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व आहे. असं असातना 19 जूनपासून शुभं कार्य सुरू होतील. पण 25 जुलैपूर्वी शुभ कार्य आटपणं भाग आहे. कारण 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...
15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 12, 2026 | 9:55 PM
Share

ज्येष्ठ अधिकमास सुरू असून 17 मे ते 15 जून असा कालावधी आहे. या महिन्याला पुरूषोत्तम मास असंही संबोधलं जातं. हा महिना भगवान विष्णुंना समर्पित असल्याने त्याला अधिकमास असं बोललं जातं. अधिकमासात पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचं महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्याचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिकमासात विवाह, मुंज, गृहप्रवेस किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. 15 जूनपासून मूळ ज्येष्ठ मास सुरू होईल. त्यामुळे पुन्हा एकदा शुभ कार्य करू शकता. पण 25 जुलै आधी सर्व शुभ कार्य पूर्ण करावी लागणार आहेत. त्याला धार्मिक कारण आहे. 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात म्हणजेच चार महिन्यांच्या कालावधीत अनेक व्रतकैवल्य असतात.

चातुर्मासात काय असतं?

चातुर्मासात सृष्टीचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णु योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णु योगनिद्रा आणि विश्राम अवस्थेत असतात. त्यामुळे चातुर्मासात शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात आरोग्याच्या आणि अध्यात्मिक दृष्टीने ऋतूनुसार आहाराचे कठोर नियमही सांगितले गेले आहेत. या चार महिन्यात वांगी, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असते. चातुर्मास देवशयनी एकदशीपासून सुरू होतो. म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते आणि देवउठनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. पंचांगानुसार, चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होतो. हा कालावधी 119 दिवसांपर्यंत असेल आणि 20 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपेल. 25 जुलैला चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत म्हणजेच 119 दिवसांच्या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात.

अधिकमास संपल्यानंतर शुभ मुहूर्त

अधिकमास संपल्यानंतर 19 जूनपासून शुभ आणि मंगळ कार्य करण्याची सुरूवात होईल. ज्योतिष्यांच्या मते, 19 जूनपासून विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. अधिक मास संपल्यानंतर 19, 21, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून रोजी विवाह मुहूर्त आहे. तर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात 4 शुभ मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 1, 6, 7 आणि 11 जुलैला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड