AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहेर किंवा शगुन 101, 501 रुपये असा दिला जातो, वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? जाणून घ्या

लग्न किंवा शुभ कार्यात शगुन देण्याची एक पारंपरिक प्रथान आहे. जुनीजाणती लोकं आहेराच्या पाकिटात 101, 501 अशी रक्कम टाकून संबंधित व्यक्तीला देतात. पण वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकदा पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आहेर किंवा शगुन 101, 501 रुपये असा दिला जातो, वरचा एक रुपया देण्याचं कारण काय? जाणून घ्या
| Updated on: Dec 04, 2024 | 6:19 PM
Share

लग्न कार्य असो की शुभ कार्य एखाद्या जुन्या जाणत्या व्यक्तीने पाकिट हातात टेकवलं की त्यात एक रुपयाचं नाणं नक्कीच असतं. खरं तर एक रूपया देण्याची गरज आहे का? असा प्रश्न पडतो. एखाद्या व्यक्तीने 501 रुपया दिले तर ते 500 रुपयेच गृहीत धरले जातात. मग हा वरचा एक रुपया उगाचच दिला जातो का? यामागे काही धार्मिक प्रथा किंवा काही वैज्ञानिक कारण आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मात विषम संख्येला गतीचं कारक मानलं जातं. तसेच प्रगतीच्या दृष्टीकोनातून विषम संख्येकडे पाहिलं जातं. विषम संख्येमुळे प्रगती एकाच जागी खुंटत नाही तर ती पुढे जात राहते. याच कारणामुळे शुभ कार्यात पाकिटात कायम विषम संख्येने रक्कम दिली जाते. पाकिटात 11, 21, 31, 51, 101, 501, 1001 असे दिले जातात.

अशुभ कार्यात याच्या उलट असते सम संख्येत रक्कम दिली जाते. 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 अस दान दिलं जातं. व्यक्तिचं निधन, श्राद्ध किंवा पितृपक्षात कायम सम प्रमाणात रुपयांचं दान दिलं जातं. सम संख्या ही शांती आणि पूर्णतेचं प्रतिक मानली जाते. मृतआत्म्याला शांती मिळावी असा या मागचा हेतू असतो. गणिती भाषेतही सम संख्या स्थिरता आणि विषम संख्येला गतीचं प्रमाण मानलं जातं. विषम संख्यांना भाग दिला की कायम काही ना काही उरतं आणि पुढे भाग सुरुच राहतो.

दुसरीकडे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचं तर संख्या आपल्या मेंदूवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकत असतात. न्यूरो-प्लेसबो यांच्या सिद्धांतानुसार, सम संख्या जीवनात स्थिरता आणतात. तर विषम संख्या सकारात्मकतेशिवाय आशा वाढवतात. उर्जेच्या सिद्धांतानुसार विचार केला तर, विषम संख्या या उर्जेच्या प्रवाहाचे प्रतिक आहे. या विषम संख्यांचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होते, असं मानलं जातं. तर सम संख्या ही ऊर्जा स्थिर असल्याचं दर्शवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.