AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्ख खाऊ नका; 14 वर्षे भोगावे लागतील त्याचे परिणाम

अनंत चतुर्दशी दिवशी उपवास करणे किंवा व्रत करणे हे फार पवित्र आणि शुभ मानले जाते. अनेक महिला आपल्या पतीसाठी देखील व्रत करतात. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की. अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा उपवासातही एक पांढरा पदार्थ असा आहे जो खाणे टाळले पाहिजे. त्याने व्रत किंवा पूजा फळते असे म्हटलं जातं.

अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्ख खाऊ नका; 14 वर्षे भोगावे लागतील त्याचे परिणाम
Anant Chaturdashi 2025 Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 04, 2025 | 11:41 AM
Share

6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला साजरी होणाऱ्या अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा व उपवास केला जातो. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत रूपासह शेषनागाचीही पूजा केली जाते व 14 गाठींचे अनंत सूत्र म्हणजे 14 गाठी मारलेला पवित्र धागा किंवा ज्याला काहीजण कलावा देखील म्हणतात. बांधल्याने संकटे दूर होतात असं म्हटलं जातं.

अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग

तसेच अनेक महिला तर आपल्या पतीसाठी खास उपवास ठेवतात. महिला त्यांचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी आणि सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी उपवास करतात. एवढंच नाही तर अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग उघडतो असंही म्हटलं जातं. अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या.

हा एक पांढरा पदार्थ खाणे टाळावे

पण तुम्हाला माहित आहे का हिंदू परंपरेनुसार, अनंत चतुर्दशीच्या उपवास करत असाल तर हा एक पांढरा पदार्थ आहे जो खाणे टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे उपवासाची शुद्धता आणि पावित्र्य जपली जाते. त्यामुळे अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊयात.

कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

तर शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये ज्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे असा पदार्थ म्हणजे मीठ. होय, उपवासात चुकूनही सामान्य मीठ खाऊ नये. कारण असे मानले जाते की त्यामुळे त्याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच त्याचे वाईट परिणाम 14 वर्ष भोगावे लागतात.

उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते

मुख्यत: उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते. सामान्य मीठ अशुद्ध मानले जाते, तर सैंधव मीठ पवित्र समजले जाऊन उपवासासाठी योग्य मानले जाते. कारण शास्त्रानुसार सैंधव मीठ पवित्र मानले जाते. ते शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढते आणि उपवासाची पावित्र्यपूर्णता टिकवते. तसेच तुम्ही अनंत चतुर्दशीला बटाटा, साबुदाणा, फळे, मिठाई, मखाणा खीर, रताळे असे पदार्थ खाऊ शकता. अनंत चतुर्दशीला मीठ त्यागल्याने पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं.भक्ताला अनंत पुण्यफळांचा लाभ मिळतो.

अनंत सूत्र बांधणे म्हणजे काय?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, अनंत सूत्राला 14 गाठी बांधणे अत्यंत शुभ असते. म्हणजे लाल धागा किंवा कलावा ज्याला 14 गाठी मारून पूजा करून हातात बांधला जातो.

अनंत चतुर्दशीला इतर करण्यासारखे उपाय

तसेच जर घरात समस्या असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर या दिवशी पूजा केल्यानंतर कलशात लवंगा आणि कापूर टाका आणि तो पेटवा, नंतर कलश घराभोवती फिरवा आणि एका चौरस्त्यावर ठेवा. किंवा दाराबाहेर ठेवला तरी चालेल.

भगवान विष्णूंची पूजा करा. तसेच त्यांचे मंत्रजाप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष