AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा

पौष महिन्याला पितृ पक्ष देखील म्हणतात. म्हणूनच यामहिन्यात अमावास्येचे महत्त्व अधिकच वाढते. जर तुमच्या कुटुंबात पितृदोष असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पौष अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास दोषांपासून मुक्तात मिळू शकेल.

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा
vastu tips
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 12:45 PM
Share

मुंबई : पौष महिन्याला पितृ पक्ष देखील म्हणतात. म्हणूनच यामहिन्यात अमावास्येचे महत्त्व अधिकच वाढते. जर तुमच्या कुटुंबात पितृदोष असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पौष अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास दोषांपासून मुक्तात मिळू शकेल.

प्रत्येक महिन्याचे 30 दिवस चंद्राच्या टप्प्यांच्या आधारावर असतात. 15-15 दिवसांच्या दोन पंधरवड्यांमध्ये विभागले जातात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. कृष्ण पक्षाच्या 15 व्या दिवशी अमावस्या येते, तर शुक्ल पक्षाच्या 15 व्या दिवशी पौर्णिमा येते. प्रत्येक महिन्यातील अमावास्येचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष हा संपूर्ण महिना पितरांना समर्पित मानला जातो.

पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीचे महत्त्व इतर अमावस्या तिथींपेक्षा अधिक वाढते. पौष महिन्यातील अमावस्या रविवार, 2 जानेवारी 2022 रोजी येईल. यावेळी अमावस्येला सकाळी ०७.१४ ते सायंकाळी ४.२३ पर्यंत सर्वार्थसिद्धी योग आहे. चाला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कराच्या उपायोजना

पितृदोषांपासून मुक्त होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल फुले व काळे तीळ टाकावे. यानंतर आपल्या पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करून सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर पीपळाला जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडावर पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. याशिवाय तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, ब्लँकेट, कपडे इत्यादी गरजूंना क्षमतेनुसार दान करा. याशिवाय पितरांच्या शांतीसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करावे.

कुटुंबात प्रेम टिकवण्यासाठी जर काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात परस्पर प्रेमाची कमतरता असेल, गैरसमज वाढले असतील तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करा.

करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल, मेहनत करूनही तुमची प्रगती होत नसेल, तर अमावस्येच्या रात्री 5 लाल फुले आणि 5 दिये प्रज्वलित करून वाहत्या नदीत प्रवाहित करा. हा उपाय करताना तुम्हाला कोणीही पाहू नये, हे ध्यानात ठेवा. याशिवाय रात्रीच्या वेळी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल खाऊ घालावे. यामुळे तुमच्या समस्या काही वेळातच दूर होतील आणि धनलाभ मिळू लागेल.

नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करूनही नोकरी मिळत नसेल तर अमावास्येला अन्नदान करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.