AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhadarpada Purnima 2021 | भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा म्हणतात. श्राद्ध या महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतात. आज भाद्रपद महिन्याची भाद्रपद पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र 16 कलांनी पूरिपूरिण असतो. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते. पौर्णिमेचा दिवस सकाळी 05 वाजून 28 मिनिटांनी सुरु होईल आणि 21 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05 वाजून 24 मिनिटांनी संपेल.

Bhadarpada Purnima 2021 | भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
Bhadrapad-Pournima
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा म्हणतात. श्राद्ध या महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतात. आज भाद्रपद महिन्याची भाद्रपद पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र 16 कलांनी पूरिपूरिण असतो. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते. पौर्णिमेचा दिवस सकाळी 05 वाजून 28 मिनिटांनी सुरु होईल आणि 21 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05 वाजून 24 मिनिटांनी संपेल.

भाद्रपद महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी जे भगवान सत्यनारायणाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात. या दिवशी विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व समस्या लवकरच दूर होतील.

शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे शुभ असते. असे मानले जाते की या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला धूप-दीप आणि फुले अर्पण करावीत. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचे सर्व त्रास दूर होतील.

आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी

जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात तांदूळ, साखर मिसळा आणि “ओम स्त्रां स्त्रीं स: चन्द्रमसे नम:” या मंत्राचा जप करताना अर्घ्य द्या. हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. याशिवाय, जर जोडप्याने एकत्र चंद्राला अर्घ्य दिले तर सर्व समस्या दूर होतील. अर्घ्य अर्पण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

संपत्ती वाढवण्यासाठी

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्ती आणि चित्रासमोर 11 कौडींवर हळदीची पेस्ट लावा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर कनकाधारा स्तोत्राचे पठण करा. या कौडी लाल कपड्यात बांधून तिजोरी आणि कपाटात ठेवल्याने संपत्ती वाढेल.

पांढऱ्या वस्तू दान करा

देवी लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी इत्र, सुगंधी चंदन अर्पण करा. या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी यंत्र स्थापित करणे शुभ आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दूध, पांढरी मिठाई, चांदी आणि पांढरे कपडे यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने धन प्राप्त होते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pitru Paksha 2021 : आजपासून पितृ पक्षाला सुरुवात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

Pitru Paksha 2021 | भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्षाला सुरुवात, श्राद्ध दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.