AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूपूर्वी माणसामध्ये कोणते बदल होतात, कसा असतो निधनानंतरचा प्रवास… काय सांगते गरुड पुराण?

वैद्यकीय शास्त्रानुसार, मृत्यूचे काही प्रकार असतात. तसेच, तज्ज्ञ म्हणतात की, मृत्यूपूर्वी आपल्या शरीरात काही बदल देखील होतात. तर मृत्यूनंतर काय होते आणि गरुड पुराण काय सांगते? याबद्दल जाणून घ्या...

मृत्यूपूर्वी माणसामध्ये कोणते बदल होतात, कसा असतो निधनानंतरचा प्रवास... काय सांगते गरुड पुराण?
| Updated on: Mar 13, 2026 | 2:47 PM
Share

मृत्यू कोणाला चूकलेला नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला मृत्यूला सामारे जावेच लागते… मृत्यू हे निसर्गातील सर्वात अपरिहार्य सत्य आहे. अनेक जण म्हणतात फक्त दोन गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू निश्चित आहे, एक म्हणजे काळ आणि दुसरी म्हणजे वेळ… एखाद्या व्यक्तीचा काळ आणि वेळ एकत्र आली की, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे… हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार, मृत्यूचे काही प्रकार असतात. तसेच, तज्ज्ञ म्हणतात की, मृत्यूपूर्वी आपल्या शरीरात काही बदल देखील होतात. मृत्यूनंतर काय होते? मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला कोणत्या भावना येतात? आपल्या पुराणकथांमध्ये, विशेषतः गरुड पुराणात, या विषयांवर अनेक रंजक गोष्टी उघड झाल्या आहेत.

मृत्यूचे प्रकार: हिंदू धर्मग्रंथांनुसार, मृत्यूचे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.

वेळेवर मृत्यू: वेळेवर मृत्यू म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती त्याचे निर्धारित आयुष्य पूर्ण करते आणि वृद्धापकाळामुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडते.

अकाली मृत्यू: अपघात, आत्महत्या, खून किंवा आजारामुळे एखाद्याचे आयुष्य संपण्यापूर्वी होणाऱ्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हणतात. अशी देखील मन्यता आहे की अकाली मृत्यु पावणाऱ्या आत्म्यांना लवकर मोक्ष मिळत नाही.

मृत्यूपूर्वी होणारे बदल: मृत्यूच्या काही मिनिटे आधी, व्यक्तीमध्ये काही स्पष्ट बदल दिसून येतात. दृष्टी अंधुक होणे, बोलण्यात अडचण येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे लक्षण दिसून येते. गरुड पुराणानुसार, मरणाऱ्या व्यक्तीला त्याचे पूर्वज किंवा यमदूत दिसतात. असे म्हटले जाते की काहींना त्यांच्या चांगल्या कर्मांवर अवलंबून देवदूत दिसतात.

कर्मफलम् – यमलोकाचा प्रवास: आत्म्याने शरीर सोडल्यानंतर आत्म्याचा प्रवास त्या व्यक्तीने केलेल्या ‘कर्मांवर’ अवलंबून असतो. ज्या आत्म्यांनी चांगले कर्म केले आहे ते शांतीने जातात. परंतु गरुड पुराण इशारा देते की ज्यांनी पाप केले आहे ते यमपुरीमध्ये पोहोचतील, जिथे त्यांना यमच्या राक्षसांकडून छळले जाईल. भक्तांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर केले जाणारे विधी आत्म्याला सांत्वन देतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?