AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : चाणाक्य नीतिनुसार या पाच सवयी असतात माणसाच्या शत्रू, दारिद्य्र सोडत नाही पाठ

Chanakya Neeti Quote Marathi आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात एखाद्या व्यक्तीच्या त्या सवयींबद्दल सांगितले आहे ज्यामुळे तो गरीब होतो. तसेच गरिबीतून त्याला बाहेर निघता येत आही. या वाईट सवयींमुळे लोकं आपले जीवन उद्ध्वस्त करतात आणि शेवटी संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवतात.

Chanakya Neeti : चाणाक्य नीतिनुसार या पाच सवयी असतात माणसाच्या शत्रू, दारिद्य्र सोडत नाही पाठ
चाणाक्य नितीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 17, 2023 | 9:47 AM
Share

मुंबई : महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य (Chanakya Neeti Marathi) यांनी आपल्या नीतिने अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेले नीतिशास्त्र सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी आखलेली धोरणे आजही लोकांसाठी यशाची सूत्रे ठरतात. आज जरी चाणक्य नाही, तरीही लोक त्यांची धोरणे वाचतात आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात एखाद्या व्यक्तीच्या त्या सवयींबद्दल सांगितले आहे ज्यामुळे तो गरीब होतो. तसेच गरिबीतून त्याला बाहेर निघता येत आही. या वाईट सवयींमुळे लोकं आपले जीवन उद्ध्वस्त करतात आणि शेवटी संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवतात. आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या कोणत्या वाईट सवयी सांगितल्या आहेत ज्यामुळे त्याचे पतन होते.

अस्वच्छ राहाणे

आचार्य चाणक्यांनी माणसाबद्दल सांगितलेली पहिली वाईट सवय म्हणजे घाणेरडे जीवन जगणे. ज्यामुळे त्याचा नाश होतो. जे लोक गलिच्छ राहतात आणि स्वच्छ कपडे घालत नाहीत. असे लोक नेहमी गरीब राहतात आणि आयुष्यात कधीच काही मिळवू शकत नाहीत. अस्वच्छतेने जगणे त्यांच्यासाठी शाप ठरते. त्यामुळे या लोकांनी ही सवय ताबडतोब सोडली पाहिजे अन्यथा त्यांचे पतन निश्चित आहे.

अविचारीपणे पैसे खर्च करणे

ज्या लोकांचे खर्चावर नियंत्रण नसते ते लवकरच गरीब होतात. एखाद्या व्यक्तीच्या गरिबीची ही लक्षणे सांगताना आचार्य चाणक्य म्हणाले की, जे लोकं आपल्या कमाईपेक्षा जास्त पैसे खर्च करतात आणि नियमितपणे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत. ते एक दिवस गरीब होतील हे निश्चित. म्हणून, एखाद्या व्यक्तीने आवश्यक असलेल्या गोष्टींवरच योग्यरित्या पैसे खर्च केले पाहिजेत.

सूर्यास्ताच्या वेळी झोपण्याची सवय

सूर्यास्ताची वेळ सर्वात महत्त्वाची मानली जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते जे लोक संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर झोपतात ते अत्यंत गरीब असतात. ही देवी लक्ष्मीची पूजा करण्याची वेळ आहे आणि या वेळी जे लोक झोपतात, त्यांना लक्ष्मी कधीही आशीर्वाद देत नाही आणि ते आयुष्यभर गरीब राहतात.

आळशीपणा

माणसाचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. चाणक्याने आपल्या नीतीमध्ये म्हटले आहे की, जे लोक आळशी स्वभावाचे असतात, असे लोक जगासाठी ओझ्यासारखे असतात. ते आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ही सवय लवकर सोडली पाहिजे आणि जीवनात अनेक महत्त्वाच्या संधी मिळाल्यावर माणसाने पुढे जात राहिले पाहिजे. चाणक्याने शेवटी म्हटले आहे की, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

सतत कडू बोलणारे लोकं

आचार्य चाणक्यांनी माणसाच्या दारिद्र्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे त्याच्या बोलण्यातील कडवटपणा सांगितला आहे. ते म्हणतात की जे लोक मोठ्या आवाजात बोलतात आणि इतरांना नेहमी शिवीगाळ करतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी नेहमी नाराज असते आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे त्यांचे काम बिघडते. म्हणून माणसाने लोकांशी नेहमी गोड बोलले पाहिजे आणि त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच