AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशावेळी कधीच रागवू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय म्हणतात?

चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात त्यांच्यावर तुम्ही कधीच रागवू नका.

Chanakya Niti : अशावेळी कधीच रागवू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 06, 2025 | 7:22 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील उपयोगी पडतात, जेव्हा-जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी रोडमॅप सारखं काम करतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवाने जीवन जगताना काय करावं? आणि काय करू नये? याचं तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात राग हा मानसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण रागामुळे आपले अनेक होणारे कामं देखील बिघडू शकतात. रागीट माणूस कोणालाच नको असतो, त्या उलट जर तुम्ही तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवला आणि तोंडात साखर ठेवली तर असा माणूस प्रत्येकाला हवा-हवा वाटतो. त्यामुळे तुमचे न होणारे काम देखील होतात. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे, माणूस हा कितीही रागीट स्वभावाचा असला तरी तीन ठिकाणी कधीही राग करू नये, त्यामुळे तुमचंच मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

परिस्थिती अनियंत्रित असते तेव्हा – चाणक्य म्हणतात जेव्हा परिस्थिती अनियंत्रित असते, तुमच्या हातात काहीही नसतं, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कधीही राग डोक्यात घालू नका, कारण यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.

लाहन मुलं चूक करतात तेव्हा – चाणक्य म्हणतात अनेक आई-वडिलांना आपल्या मुलाची चूक झाली की त्याच्यावर ओरडण्याची त्याला मारहाण करण्याची सवय असते, मात्र ही सवय अतिशय चुकीची आहे, कारण मुलं चुकांमधूनच अनेक गोष्टी शिकत असतात, मग अशावेळी तुम्ही त्यांना रागवलात तर त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो, अशावेळी त्यांची नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता बाधित होऊ शकते.

वृद्ध व्यक्तींवर रागवू नका- चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा वृद्ध व्यक्ती आपल्याला काही सल्ला देतो, तेव्हा त्याच्यावर रागवू नका, कारण तो आपल्यापेक्षा अनुभवाने खूप मोठा असतो, त्याच्या सल्ल्यामुळे आपला फायदाच होणार असतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.