AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात फक्त ही एक सवय बदला, यश तुमचंच

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये व्यक्तीला ज्या गोष्टींमुळे अपयश येऊ शकतं अशा कारणांवर चर्चा केली आहे, तुम्ही जर या गोष्टी टाळल्या तर यश हे तुमचंच असणार आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात फक्त ही एक सवय बदला, यश तुमचंच
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2025 | 7:59 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान राजनीतीतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ, अर्थशास्त्र होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली, ज्या गोष्टी आज देखील काही लोकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रथांमध्ये व्यक्तीची आदर्श जीवनपद्धत कशी असावी याबद्दल सखोल माहिती दिली आहे. ज्यामध्ये जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षणं काय? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्षणं कोणती? राजाचा त्याच्या प्रजेसोबतचा व्यवहार कसा असावा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे कसं ओळखावं असे एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

दरम्यान आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीच्या दैनंदीन जीवनाशी निगडीत आहेत. आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही जे काम करणार आहात, त्या कामामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. आर्य चाणक्य म्हणतात या सवयी तुम्ही जर टाळल्या तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. याच सवयीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही जर एखादं महत्त्वाचं काम हाती घेतलं असेल तर ते पूर्णत्वास जाईपर्यंत कोणालाही त्याबद्दल सांगू नका, तुमच्या किती जवळच्या माणूस असला तरी तुमच्या सर्व योजना या गुप्त ठेवा, तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल. चाणक्य पुढे म्हणतात की तुम्ही जर एखादी योजना, काम हाती घेतलं तर स्वस्त बसू नका, आळस करू नका, आळस हा ते काम आणि तुमच्यामधील सर्वात मोठा शत्रू आहे. आळस न करता दिवस रात्र मेहनत करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.