AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात तुमच्या ‘या’ सवयी मुलांचं आयुष्य बरबाद करतात

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात तुमच्या 'या' सवयी मुलांचं आयुष्य बरबाद करतात
| Updated on: May 05, 2025 | 10:03 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगत असताना मार्गदर्शक ठरतो. व्यक्तीने आयुष्य जगत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? काय करावं? काय करू नये? आदर्श राजा कसा असावा? त्याने प्रजेशी कसं वागावं? प्रजेचं कर्तव्य काय आहे? आपला खरा मित्र कसा ओळखावा, शत्रू कोणाला म्हणावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चानक्यनीती नावाच्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे.

आर्य चाणक्य म्हणतात आई-वडील बनणं ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्या मुलांना त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सक्षम बनवले, त्याच्यावर योग्य ते संस्कार करणे, वेळ प्रसंगी कठोर बनणे, तेवढंच मुलांवर प्रेम देखील करणं अशा अनेक भूमिका आई-वडिलांना एकाचवेळी कराव्या लागतात. मात्र हे सगळं करत असताना आई-विडिलांकडून काही चुका देखील होऊ शकतात, ज्यमुळे तुमच्या मुलाचं आयुष्य देखील बरबाद होऊ शकतं असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मुलांचे सर्वच हट्ट पूर्ण करू नका –  आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही मुलांचे सर्वच हट्ट पूर्ण करू नका, एखादी गोष्टी मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना शिकू द्या, तुम्ही जर मुलांचे सर्व हट्ट पूर्ण केले तर ते संघर्ष करायला शिकणार नाहीत.

संगत तपासा – आपला मुलगा हा कोणाच्या संगतीमध्ये राहातो, यावर बारकाईने लक्ष ठेवा, कारण संगत ही एक अशी गोष्ट आहे, जी मुलांना घडवू देखील शकते आणि बिघडवू देखील शकते.

मुलांवर योग्य संस्कार करा – चाणक्य म्हणता मानवाच्या आयुष्यात संस्काराला खूप महत्त्व आहे. वेळीच जर योग्य संस्कार झाले तर तुमच्या मुलाचं आयुष्यच बदलून जाईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.