AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचंय?, चाणक्यांची ही निती तुम्ही नक्की वाचा…

Chanakya Niti : जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमचे मन स्थिर ठेवणं महत्वाचे आहे, कारण केवळ स्थिर मनाने कोणतेही काम समर्पणाने करता येते. तरच आपण त्या कार्याचा आनंद मिळू शकतो आणि फळही...!

Chanakya Niti : आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचंय?, चाणक्यांची ही निती तुम्ही नक्की वाचा...
Chanakya Niti
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 16, 2021 | 8:08 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची धोरणं, त्यांनी अवलंबलेल्या निती जगप्रसिद्ध आहेत कारण त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक सुख दु:खाच्या कारणांचा त्यांनी मुळाशी जाऊन शोध घेतला. आचार्य चाणक्य यांना खूप अगोदर कोणत्याही परिस्थितीचा अंदाज येत असे. त्यांच्या योजना इतक्या मजबूत होत्या की कोणालाही त्याचा सुगावाच लागत नव्हता आणि शत्रू अगदी जाळ्यात फसायचा. आचार्यांची तीक्ष्ण बुद्धी, अनुभव आणि धोरणांमुळे चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनले. आजही आचार्य यांच्या जीवन विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखं आहे. (Chanakya niti demerit Can Spoil your hardwork Acharya Chanakya)

अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्, जनो दहति संसर्गाद् वनं संगविवर्जनात…

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य असं म्हणतात, “ज्याचे मन स्थिर नसतं, त्याला अलोट माणसांच्या गर्दीत वा एकटेपणात सुख मिळत नाही. अशी व्यक्ती लोकांमध्ये मत्सर आणि एकटेपणात पश्चाताप करतात.”

या श्लोकाचा अर्थच असा आहे की, जर खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर चंचल मनावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. ज्याचं मन नियंत्रणात आहे, तो काहीही साध्य करू शकतो. परंतु ज्याचे मन चंचल आहे, त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याची मेहनत फुकट जाण्याची शक्यता असते. कारण त्याचं मन कधीच एका जागेवर थांबत नसतं. ते सतत इथून तिथे आणि तिथून तिथे जात असते.

त्यामुळे परिश्रम करताना देखील एकाग्र चित्ताने न करता तो सतत विचलित होत असतो. अशा व्यक्तींचं मन इतरांची प्रगती पाहून जळायला होतं आणि ते निराश होतात. अशा व्यक्ती लोकांच्या गर्दीत किंवा एकटेपणात आनंदी राहत नाहीत.

म्हणूनच, जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमचे मन स्थिर ठेवणं महत्वाचे आहे, कारण केवळ स्थिर मनाने कोणतेही काम समर्पणाने करता येते. तरच आपण त्या कार्याचा आनंद मिळू शकतो आणि फळही…! गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व विषद केले आहे. असे म्हटले आहे की, “ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी सगळं जिंकलं, जे मनाने हरले ते काहीच जिंकू शकत नाही”

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

(Chanakya niti demerit Can Spoil your hardwork Acharya Chanakya)

हे ही वाचा :

Chanakya Niti | व्यक्तीची मती भ्रष्ट करतात हे अवगुण, यांचा त्याग करणेच बरं

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या