AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत तसेच अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये यशस्वी लोकांच्या पाच सवयी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीमध्ये या सवयी असतात त्यांचा जगात कोणीच पराभव करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 7:41 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात यश मिळवणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. कोणत्याच व्यक्तीला असं सहज यश मिळत नाही. कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हा त्याची किंमत मोजावी लागते, त्याग करावा लागतो. परिश्रमामध्ये सातत्य ठेवावं लागतं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की यशस्वी होण्यासाठी केवळ कष्टच महत्त्वाचे नसतात. तर दिशा देखील महत्त्वाची असते, जर तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रयत्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. जो माणूस आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो, त्या प्रत्येक माणसांकडे असे पाच गुण असतात, ज्याच्या बळावरच तो हे यश संपादन करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिस्त – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त नावाची गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेच आहे. जर तुमच्या कामामध्ये शिस्त नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. मात्र जर तुमच्या कामात शिस्त असेल तर या जगातील कोणताही व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशापासून थांबवू शकणार नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आत्मविश्वास – चाणक्य म्हणतात जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात, त्यामुळे तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं असतं.

निश्चय – चाणक्य म्हणतात माणसाकडे निश्चय पाहिजे, जर तुम्ही ठरवलं मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, मग ती मिळेपर्यंत कधीही मागे हटू नका, असा सल्ला चाणक्य देतात.

शांत स्वभाव – चाणक्य म्हणतात जे लोक रागीट असतात ते हाताने आपलं वाटोळं करून घेतात, त्यामुळे माणसाने आपला स्वभाव नेहमी शांत ठेवला पाहिजे.

ज्ञान मिळवण्याची इच्छा – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती सतत काही न काही नवीन शिकण्याच्या भूमिकेमध्ये असतो, तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले