AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. विद्युत गन आणि छर्रे वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोप फेटाळले असले तरी, पवन खेडा आणि प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
delhi policeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 11:18 AM
Share

जंतरमंतरवर गेल्या दोन दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी तरुणांविरोधात इलेक्ट्रिक गनचा वापर केल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्तात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवाल केला आहे.

जंतरमंतरवर तरुणांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमधून खेडा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट सवालच केला आहे. राष्ट्रीय राजधानीत तुमच्याच मुलांविरुद्ध बंदुका, ग्रेनेड्स आणि उघड युद्ध? अमित शाह, यानंतर पुढे काय येणार आहे? असा सवाल पवन खेडा यांनी केला आहे.

बंदी घातलेल्या बंदुकातून छर्रे

तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या बंदुकीतून विद्यार्थ्यांवर छर्रे डागण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छर्रे लागलेल्या विद्यार्थ्याचा फोटो दाखवला. ही दहशतवाद्यासारखी पोलिसांनी कृती असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांचा खुलासा

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. अशा बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. दिशाभूल करणाऱ्या आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्सने आंदोलकांविरोधात इलेक्ट्रिक स्टन गनचा वापर केला नाही, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून जंतरमंतरव मोठं आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी संपूर्ण दिल्ली दणाणून सोडली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणँ आहे. या आंदोलनाला दोन दिवसापासून हिंसक वळण लागलं आहे. सोमवारी तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांवर छर्रे डागल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं असून दिल्ली पोलिसांनी असं घडलंच नसल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट