AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोकं जर घरात असतील तर सावधान, तुमचा जीव धोक्यात आहे

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्तींची अशी काही लक्षणं सांगितली आहेत, चाणक्य म्हणतात असे लोकं जर तुमच्या घरात असतील तर त्यांच्यापासून नेहमी सावध राहा.

Chanakya Niti : असे लोकं जर घरात असतील तर सावधान, तुमचा जीव धोक्यात आहे
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 7:38 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपली बुद्धी आणि कुटनीतीच्या जोरावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चाणक्य यांनी या ग्रंथमाध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात नेहमी सावध राहिलं पाहिजे, कोणत्याही प्रसंगाला आणि परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असली पाहिजे. कारण कधी कोणती वेळ येते हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या घरामध्ये असे काही लोक असतात, ज्यांच्यासोबत राहणं म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहण्या समान असतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

पर पुरुषावर प्रेम करणारी बायको – चाणक्य म्हणतात ज्या घरात नवरा जिवंत असताना देखील बायको एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते किंवा त्याच्या जाळ्यात अडकले अशी स्त्री त्या घरातील कुटुंबप्रमुखाच्या जीवाला सर्वात मोठा धोका असू शकते. कारण अनेकदा अशा स्त्रीमुळे कुटुंबप्रमुखावर आपला जीव गमावण्याची वेळ येते. अशा घरामध्ये कुटुंबप्रमुख पुरुषाला कुठलंही स्थान नसतं, त्यामुळे अशा महिलांपासून सावध राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

विश्वासघातकी मित्र – चाणक्य म्हणतात जिथे विश्वासघातकी मित्र असतो, तिथे फसवणूक अटळ असते, असे लोक आपल्या थोड्या फायद्यासाठी सुद्धा तुमचा जीव घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, त्यामुळे असे मित्र वेळीच ओळखता आले पाहिजेत, त्यांच्यापासून सावध राहण्यातच तुमचं हीत आहे.

उद्धट नोकर – चाणक्य म्हणतात ज्या घऱातील नोकर उद्धट असतात, जे मालकाचं काम ऐकत नाहीत, छोट्या-छोट्या फायद्यासाठी मालकाची फसवणूक करू शकतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. जर तुम्ही या तीन प्रकारच्या लोकांपासून सावध राहिले नाहीत तर एक दिवस तुमची मोठी फसवणूक होऊ शकते, मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.