Chanakya Niti : हे सात लोक जर झोपले असतील तर त्यांना लगेच जागा करा, अन्यथा होईल खूप मोठं नुकसान

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की समजात असे काही लोक असतात ते जर झोपले तर समाजाचं आणि काहीवेळा वैयक्तिक तुमचं देखील मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे या लोकांना झोपेतून जागं केलं पाहिजे.

Chanakya Niti : हे सात लोक जर झोपले असतील तर त्यांना लगेच जागा करा, अन्यथा होईल खूप मोठं नुकसान
chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 9:38 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात जे जर झोपले असतील तर त्यामुळे समाजाचं मोठं नुकसान होऊ शकतं, अख्खं राज्य संकटात सापडू शकतं, त्यामुळे कुठेही हे लोक जर तुम्हाला झोपलेले दिसले तर त्यांना लगेचच जागं करा, त्यामुळे संभाव्य नुकसान टळेल. चाणक्य म्हणतात जर विद्यार्थी झोपला तर त्याचा अभ्यास होणार नाही, जर विद्यार्थ्याचा अभ्यास झाला नाही तर तो परीक्षेत पास होणार नाही, त्याला चांगल्या रोजगाराच्या संधी मिळणार नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबाचं तर मोठं नुकसान होणारच आहे, त्यासोबतच राज्याचं देखील नुकसान होणार आहे, कारण सुशिक्षित तरुण हे कोणत्याही राज्याची साधनसंपत्ती असते. त्यांच्या आधारावरच राज्याचा विकास घडून येतो, त्यामुळे विद्यार्थी जर झोपले असतील तर त्यांना जागं केलं पाहिजे.

नोकर – चाणक्य म्हणतात जर घरचा नोकर झोपला असेल त्यामुळे मालकाचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे नोकर जर झोपा काढत असेल तर त्याला जागं केलंच पाहिजे.

सुरक्षा रक्षक – चाणक्य म्हणतात घराच्या संरक्षणाची जबाबदारी ही सुरक्षा रक्षकावर असते, अशा स्थितीमध्ये तो जर झोपला, तर घरात कधीही चोरी होऊ शकते, यामुळे मालकाचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे जर सुरक्षा रक्षक झोपला असेल तर त्याला झोपेतून जागं केलं पाहिजे.

सैनिक – चाणक्य म्हणतात जर सीमेवरील सैनिक झोपले तर शत्रू सहज राज्यात प्रवेश करू शकतात, शत्रू तुमचं राज्य सहज जिंकू शकतात. झोपलेल्या सैन्यांमुळे राज्य मोठ्या संकटात सापडू शकतं, त्यामुळे झोपलेल्या सैन्याला जागं केलं पाहिजे.

राजा – चाणक्य म्हणतात संपूर्ण राज्याची जबाबदारी राजावर असते, मग अशा परिस्थितीमध्ये त्याला झोपून कसं चालेल. जर राजा झोपला तर राज्य संकटात येईल, त्यामुळे राजाला झोपेतून जागं केलं पाहिजे.

शेतकरी – चाणक्य म्हणतात जर शेतकरी झोपला तर संपूर्ण राज्यात अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होईल, त्यामुळे शेतकऱ्याला झोपेतून जागं केलं पाहिजे.

शिक्षक – चाणक्य म्हणतात जर शिक्षक झोपला तर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे शिक्षकाला झोपेतून जागं केलं पाहिजे.