AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर तुमच्याकडेही असेल हा गुण तर आयुष्यात कधीच तुमचा पराभव होणार नाही, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांच्या या नीती आजच्या काळातही विचार करायला भाग पाडतात.

Chanakya Niti : जर तुमच्याकडेही असेल हा गुण तर आयुष्यात कधीच तुमचा पराभव होणार नाही, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य नीती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 7:45 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर विस्तृत लिखाण केलं आहे, माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याबद्दल त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य म्हटलं की यश -अपयश आलंच. आपल्या भोवती असे अनेक लोक असतात, की ज्यांना एकदा जर अपयश आलं तर ते त्या अपयशानं खचून जातात, पुन्हा कधीच प्रयत्न करत नाहीत. मात्र त्यामुळे त्यांचं आयुष्यात खूप मोठं नुकसान होतं. तुम्हाला जेव्हा तुमच्या आयुष्यात अपयश येतं तेव्हा तुम्ही संयम ठेवला पाहिजे, पुन्हा नव्याने प्रयत्न केले पाहिजेत. कोणाला दुसऱ्या प्रयत्नात यश येईल, तर कोणाला तिसर्‍या प्रयत्नात यश येत. मात्र तुम्ही जर प्रयत्नच सोडून दिले तर मग मात्र तुम्ही कधीही यशस्वी होणार नाहीत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. असे काही गुण आहेत, जे माणसाजवळ असतील तर त्याचा कधीही आयुष्यात पराभव होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नम्रता – चाणक्य म्हणतात नम्रता हा असा गुण आहे, तो जर तुमच्या आंगी असेल तर तुम्ही जग जिंकण्याची ताकद ठेवता. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं देखील दिली आहेत. चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या विहिरीमध्ये पाणी वर काढण्यासाठी बादली आत सोडता, तेव्हा त्या बादलीला आधी खाली वाकावं लागतं, जेव्हा ती वाकडी होते तेव्हाच तिच्यामध्ये पाणी येतं. नम्रता हा गुण देखील असाच आहे, आपण जेव्हा नम्र असू तेव्हाच आपल्याला कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होते. जसं की विद्यार्थ्यांनी नेहमी नम्रतेनंच ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. जे नोकरदार असतात, किंवा व्यावसायिक असतात त्यांच्या डोक्यावर नेहमी बर्फ असावा तसेच त्यांच्या तोंडात साखर असावी, अर्थात त्यांच्याकडे नम्रता असावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. माणूस कितीही बलवान असेल आणि त्याच्या अंगात जर नम्रता नसेल तर त्याचा पराभव निश्चित असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम – चाणक्य म्हणतात माणसाजवळ आणखी एक गुण हवाच आणि तो म्हणजे संयम जर माणसाकडे संयम असेल तर, माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतो असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्हाला वारंवार अपयश येतं तेव्हा खचून जाऊ नका, तर थोडं थांबा सयंम ठेवा आणि पुन्हा जोमाने कामाला लागा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ