AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन लोकांची कधीच संगत नको, आयुष्य उद्ध्वस्त होईल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात, ज्यांची संगत आयुष्यात कधीही करू नये.

Chanakya Niti : या तीन लोकांची कधीच संगत नको, आयुष्य उद्ध्वस्त होईल
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 2:51 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य जगताना माणसाने नेहमी काळजी घेतली पाहिजे, तुमचं एक पाऊल जरी चुकीचं पडलं, तर तुमचं अख्ख आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. समजात अशी काही माणसं असतात, ज्यांची संगत कधीही करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

व्यसनी मित्र – चाणक्य म्हणतात जर तुमचे मित्र हे व्यसनी असतील, तर त्यांची संगत आजच सोडा कारण चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. मात्र वाईट सवयी लगेच लागतात. जर तुमचा मित्र दारू पित असेल तर ती सवय तुम्हाला देखील लागू शकते, व्यसनामुळे संसाराचं वाटोळ होतं, आयुष्य उद्ध्वस्त होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

जुगार – चाणक्य म्हणतात जे लोक जुगारी असतात, अशा लोकांची संगत कधीच करू नका, कारण हे लोक खूप अविचारी असतात. ते जुगारासाठी आपलं घरदार देखील पणाला लावू शकतात. जर तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

परस्त्री – चाणक्य म्हणतात माणसाने आपल्या जीवनसाथीसोबत नेहमी एकनिष्ठ असावं, त्यामुळे घरात वाद होत नाहीत, अन्यथा संसाराचं वाटोळ होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत एकनिष्ठ असाल तर तुमचा संसार सुखाचा होतो, असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार....
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
COEP कॉलेज : पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य काय?
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांचं विधान
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा,
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा, चक्क बुटाने...
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी