AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असे काही संकेत सांगितले आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती हा चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो, तेव्हा हे संकेत दिसून येतात. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 11:14 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले, या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती वाईट मार्गावर चालू लागतो, तेव्हा त्याला काही संकेत मिळतात, हे संकेत लक्षात घ्यावेत, त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मोठ्या आणि अनुभवी लोकांकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात जे लोक हे आपल्यापेक्षा मोठे असतात किंवा त्यांचा अनुभव मोठा असतो, अशा लोकांच्या सल्ल्याकडे चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये, कारण त्यांनी आयुष्यात तो अनुभव घेतलेला असतो. मात्र जेव्हा आपण अशा लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा समजून जावं की आपल्या पतनाची सुरुवात झाली आहे.

अहंकार – चाणक्य म्हणतात व्यक्तीचा जर कोणता सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे त्याचा अंहकार. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा गर्व झाला असेल तर समजून जा की तो चुकीच्या मार्गाने चालला आहे. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका. लक्षात ठेवा गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा अहंकार होतो, तेव्हा त्याला चांगलं काय आणि वाईट काय? यातील फरक कळत नाही, परिणामी त्याच्यावर पश्चातापाची वेळ येते.

शॉर्टकट – चाणक्य म्हणतात जे लोक यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरतात अशा लोकांना काही क्षणापुरतं तर यश मिळतं, मात्र हे यश दीर्घकाळ टिकत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा यशाला कधीही शॉर्टकट नसतो. तुम्ही जर यशासाठी शॉर्टकट वापरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही तुमची फसवणूक करत आहात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.