AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असे काही संकेत सांगितले आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती हा चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो, तेव्हा हे संकेत दिसून येतात. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 11:14 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले, या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती वाईट मार्गावर चालू लागतो, तेव्हा त्याला काही संकेत मिळतात, हे संकेत लक्षात घ्यावेत, त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मोठ्या आणि अनुभवी लोकांकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात जे लोक हे आपल्यापेक्षा मोठे असतात किंवा त्यांचा अनुभव मोठा असतो, अशा लोकांच्या सल्ल्याकडे चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये, कारण त्यांनी आयुष्यात तो अनुभव घेतलेला असतो. मात्र जेव्हा आपण अशा लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा समजून जावं की आपल्या पतनाची सुरुवात झाली आहे.

अहंकार – चाणक्य म्हणतात व्यक्तीचा जर कोणता सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे त्याचा अंहकार. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा गर्व झाला असेल तर समजून जा की तो चुकीच्या मार्गाने चालला आहे. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका. लक्षात ठेवा गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा अहंकार होतो, तेव्हा त्याला चांगलं काय आणि वाईट काय? यातील फरक कळत नाही, परिणामी त्याच्यावर पश्चातापाची वेळ येते.

शॉर्टकट – चाणक्य म्हणतात जे लोक यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरतात अशा लोकांना काही क्षणापुरतं तर यश मिळतं, मात्र हे यश दीर्घकाळ टिकत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा यशाला कधीही शॉर्टकट नसतो. तुम्ही जर यशासाठी शॉर्टकट वापरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही तुमची फसवणूक करत आहात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.