AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘अशा’ लोकांनी कितीही मेहनत केली तरी ते कधीच यशस्वी होत नाहीत

आर्य चाणक्य एक महान विद्वान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी लिहिलेला चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आज देखील अनेकांना जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात 'अशा' लोकांनी कितीही मेहनत केली तरी ते कधीच यशस्वी होत नाहीत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 13, 2025 | 8:35 PM
Share

आर्य चाणक्य हे एक थोर विद्वान, प्रसिद्ध कुटनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेला चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये पत्नी-पत्नीचं नात कसं असावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पतीची लक्षण काय आहेत, राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत? आपला शत्रू कोण आहे? आपला खरा मित्र कसा ओळखावा अशा एक ना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे.

आर्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे त्याने कितीही मेहनत केली तरी त्याला अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीनं आपल्यामधील ते गुण ओळखून त्यांना दूर केलं पाहिजे, तर आणि तरच त्यांना यश मिळू शकेल. आर्य चाणक्या यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही कितीही प्रयत्न करा मात्र जर तुमच्यामध्ये शिस्त नसेल तर तुमचे सर्व प्रयत्न अपूर्ण आहेत. तुमच्या आयुष्यात शिस्त असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्तप्रिय असलं पाहिजे. चाणक्य पुढे सांगतात जशी तुमच्या आयुष्यात शिस्त महत्त्वाची आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे संयम

जर तुमच्याकडे संयम नसेल तर तुमचा धीर लवकर खचतो आणि तुमच्या हातात आलेलं यश तुमच्यापासून दूर जातं. त्यामुळे आयुष्यात मानसानं संयम ठेवला पाहिजे. संयमी मानसाला एक न एक दिवस यश नक्कीच मिळतं.

व्याक्तीच्या आयुष्यात जेवढं महत्त्व शिस्त आणि संयमाचं आहे, तेवढंच महत्त्व प्रामाणिकपणाचं आहे. तुमच्या कष्टाला प्रामाणिक पणाची जोड जर असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....