AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे भारतातील एक मोठे विचारवंत होते, ते केवळ विचारवंतच नव्हते तर ते अर्थतज्ज्ञ देखील होते, व्यक्तीच्या आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो, त्या पैशांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं? पैशांची बचत कशी करायची? अशा अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या पुस्तकामध्ये सोप्या भाषेत समजून सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 7:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की काही लोक खूप गरीब असतात, मात्र त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात यशाची एक -एक पायरी चढत जातात आणि श्रीमंत होतात. मात्र काही लोक हे गर्भश्रीमंत असतात, मात्र त्यांच्या उतार वयात हे लोक कंगाल होतात? याचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यामुळे व्यक्तीने नेहमी आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

उधळपट्टी – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना पैशांची किंमत कळत नाही, जे कारण नसताना देखील पैशांची उधळपट्टी करतात, चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतात. ते कितीही श्रीमंत असले तरी कालांतराने गरीब होतात. त्यामुळे विनाकारण पैसा खर्च करू नये, पैशांची बचत करावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दुसर्‍याचा अपमान – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात की जे लोक कायम दुसऱ्या व्यक्तीला आपल्या पेक्षा कमी समजतात, त्यांचा अपमान करतात. त्यामुळे आपल्यापासून लोक दुरावे जातात, आपल्या संकट काळात कोणीही मदतीला येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला योग्य तो मान -सन्मान द्या.

रागीट स्वभाव – चाणक्य म्हणतात काही लोक हे मुळातच रागीट स्वभावाचे असतात, अशा लोकांना व्यापार, नोकरीमध्ये त्यांच्या स्वभावाचा फार मोठा फटका बसतो. त्यामुळे राग नियंत्रणात ठेवावा. लक्षात ठेवा माणसाच्या जीभेवर नेहमी साखर असावी आणि डोक्यावर बर्फ

आळस – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात ते कितीही श्रीमंत असले तरी ते कालांतराने गरीब होतात, कारण असे लोक कोणतंही काम न करता आपल्याजवळ असलेले पैसे खर्चत राहतात.

वेळीची किंमत – चाणक्य म्हणतात ज्याला वेळीची किंमत कळाली तोच माणूस जगात यशस्वी ठरतो, त्यामुळे वेळेचा आदर करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.