AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या दोन गोष्टीला जे लोक भीतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, चाणक्य नीती काय सांगते?

आर्य चाणक्य एक कुशल व्यवस्थापक देखील होते, माणसाने आपल्या आयुष्याचं योग्य व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आयुष्यात अशा दोन गोष्टी असतात ज्यांना तुम्ही कधीच घाबरू नका.

Chanakya Niti : या दोन गोष्टीला जे लोक भीतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, चाणक्य नीती काय सांगते?
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 8:27 PM
Share

आर्य चाणक्य हे त्या काळातील एक कुशल व्यवस्थापक देखील होते, व्यक्तीने आपल्या आयुष्याचं उत्तम व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. माणसाने आदर्श जीवन कसं जागावं? आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात, अशा स्थितीमध्ये तुम्ही संयम सोडता कामा नये. जर तुम्ही संयम सोडला तर तुमचा पराभव निश्चित आहे. मात्र कसोटीच्या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की कष्ट केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त तुम्हाला यश मिळेल. मात्र तुम्हाला आयुष्यात कधी न कधी अशा दोन गोष्टींचा सामना करावा लगतो, त्यावेळी मात्र न भीता त्याचा संयमाने सामना करा, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

अपयश – चाणक्य म्हणतात यश ही अपयशाची पहिली पायरी असते, त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं की घाबरून जाऊ नका, तुमचं काम तुम्ही मध्येच सोडू नका. एखाद्या गोष्टीमध्ये एकदा अपयश आलं म्हणजे तुमचा पराभव होत नाही. खरा पराभव तेव्हा होतो, जेव्हा दुसऱ्यांदा अपयशाच्या भीतीने तुम्ही ती गोष्ट पुन्हा करतच नाही. त्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे आयुष्यात काहीही झालं तरी कधीच अपयशाला घाबरू नका, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

टीका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं, तेव्हा तुमच्यावर लगेचच टिका सुरू होतो. जे या टीकेला घाबरून कायमची माघार घेतात, असे लोक आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत. या उलट जे लोक या टीकेला सकारात्मक घेऊन आपले प्रयत्न सुरूच ठेवतात, असे लोक एक दिवस आपल्या यशानं आपल्या टीकाकारांचे तोंड गप्प करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत